AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराजांना भेटायला गेलेल्या विराट-अनुष्काच्या हातात दिसली ‘इलेक्ट्रॉनिक अंगठी’; कॅमेरापासून लपवण्याचा केला प्रयत्न

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने सोमवारी 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी मथुरेला पोहोचला.

प्रेमानंद महाराजांना भेटायला गेलेल्या विराट-अनुष्काच्या हातात दिसली 'इलेक्ट्रॉनिक अंगठी'; कॅमेरापासून लपवण्याचा केला प्रयत्न
Virat Kohli and Anushka Sharma Image Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2025 | 3:34 PM
Share

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटर विराट कोहली त्याच्या पत्नीसोबत अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या आश्रमात पोहोचला. सोमवारी विराटने निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर लगेच त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबत प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. विराट आणि अनुष्का हे प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात सतत जात असतात. आता आयुष्यातील इतक्या मोठ्या निर्णयानंतर दोघं पुन्हा एकदा त्यांच्या दरबारी पोहोचले आहेत. यावेळी दोघांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओ आणि फोटोमधील विराट – अनुष्काच्या हातातील एका इलेक्ट्रॉनिक अंगठीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय.

विराट आणि अनुष्का यांनी देवाचं नाव जपण्यासाठी बोटात डिजिटल टॅली इलेक्ट्रॉनिक फिंगर क्लिकर रिंग घातली होती. विराटने जेव्हा प्रेमानंद महाराजांसमोर हात जोडले, तेव्हा त्यांच्या बोटात ही इलेक्ट्रॉनिंग अंगठी दिसून आली. परंतु यावेळी अनुष्काने तिच्या बोटातील अंगठी लपवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये विराटच्या हातात गुलाबी रंगाची ही अंगठी सहज पहायला मिळतेय. देवाचं नाव किती वेळा जपलं गेलं, यासाठी ही डिजिटल टॅली काऊंटर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक टॅली काऊंटर रिंग वापरली जाते. जपमाळेऐवजी अनेकजण आजकाल या रिंगचा वापर करतात.

प्रेमानंद महाराजांनी यावेळी अनुष्काला विचारलं, “खुश आहेस?” तेव्हा अनुष्काच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तर विराट म्हणाला, “होय, आता ठीक आहे.” त्यानंतर महाराज त्याला म्हणतात, “तू स्वस्थ राहायला हवं.” हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी प्रेमानंद महाराज विराट-अनुष्काला म्हणाले, “हे वैभव मिळणं कृपा नाही, हे पुण्य आहे. आपल्या आतील चिंतन बदलणं ही देवाची कृपा मानली जाते. तुम्ही जसे आहात तसेच राहा, सांसारिक बनून राहा. परंतु आतील चिंतन बदललं पाहिजे. त्यात यशाची भावना राहू नये. प्रभू अनेक जन्म व्यतीत झाले, आता मला तुम्ही हवे आहात, असा मनात विचार हवा.” यावेळी अनुष्का त्यांना विचारते की, “देवाच्या नामजपाने हे शक्य आहे का?” त्यावर महाराज होकारार्थी उत्तर देतात.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय