AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा सलमान खानवर लोकांनी साधला निशाणा, तेव्हा बचावासाठी धावली ऐश्वर्या राय

1998 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र 2002 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. इंडस्ट्रीत या दोघांच्या नात्यावर सर्वाधिक चर्चा झाली होती. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने एका गोष्टीसाठी सलमानची साथ दिली होती.

जेव्हा सलमान खानवर लोकांनी साधला निशाणा, तेव्हा बचावासाठी धावली ऐश्वर्या राय
Salman and AishwaryaImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 29, 2023 | 10:42 AM
Share

मुंबई : 29 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांचं नातं हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांपैकी एक आहे. एकेकाळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. सलमानच्या आक्रमक वागणुकीमुळे नातं मोडल्याचं ऐश्वर्याने काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर त्याने माझ्यावर रागाच्या भरात हातसुद्धा उचलला होता, अशीही कबुली ऐश्वर्याने दिली होती. मात्र जेव्हा सलमान एका कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकला, तेव्हा ऐश्वर्याने त्याला पाठिंबा दिला होता. 2016 मधील ही घटना आहे. त्यावेळी रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून सदिच्छा दूत म्हणून सलमानची नियुक्ती करण्यात आली होती.

सलमानची सदिच्छा दूत म्हणून निवड झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अभिनेत्यापेक्षा क्रीडा क्षेत्रातील एखाद्या नामांकित व्यक्तीला हा सन्मान द्यायला पाहिजे होता, असं मत अनेकांनी मांडलं होतं. इतकंच नव्हे तर गायक मिका सिंग आणि योगेंद्र दत्ता यांनीसुद्धा सलमानची निवड केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. हा संपूर्ण वाद सुरू असतानाच ऐश्वर्याने सलमानला पाठिंबा दिला होता.

2016 मधील एका कार्यक्रमात पत्रकाराने सलमान खानच्या या वादावर ऐश्वर्याच्या मताबद्दल विचारलं होतं. त्यावर ऐश्वर्या म्हणाली, “मी यावर असं म्हणेन की जो कोणी या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चांगलं काम करतोय किंवा कला, संगीत, क्रीडा या क्षेत्रांमध्ये सुधारणांसाठी काम करतोय, बोलतोय किंवा उभा राहतोय, तर त्या व्यक्तीकडे जबाबदारी देण्यात कोणतीच समस्या नसली पाहिजे.” ऐश्वर्याच्या या प्रतिक्रियेची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती.

ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमानने 2010 मध्ये त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “तिने अभिषेकशी लग्न केल्यामुळे मी फार खुश आहे. तो एका चांगल्या कुटुंबातील चांगला मुलगा आहे. ती तिच्या आयुष्यात खुश राहो हीच माझी इच्छा आहे”, असं सलमान म्हणाला होता. इंडस्ट्रीतील जवळपास 35 वर्षांच्या कारकिर्दीत सलमानचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. मात्र 1990 आणि 2000 दरम्यान त्याचं रिलेशनशिप सर्वाधिक चर्चेत होतं. ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं नातं त्यावेळी जगजाहीर होतं. मात्र ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानवर काही गंभीर आरोप केले होते. सलमानने मारहाण केल्याचा दावा ऐश्वर्याने केला होता.

2002 मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या सलमानसोबतच्या ब्रेकअपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. दारुच्या नशेत सलमानने हात उचलल्याचा दावा तिने केला होता. “मी त्याच्या वाईट काळात दारुच्या नशेतील गैरवर्तनाला सहन करत त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याबदल्यात मला त्याच्या गैरवर्तणुकीचा (शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक), अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. म्हणून इतर कोणत्याही स्वाभिमानी महिलांप्रमाणे मीसुद्धा त्याच्यासोबतचं नातं संपुष्टात आणलं”, असं ऐश्वर्या म्हणाली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.