AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोट न घेता 35 वर्षे वेगळं राहिले.. नाना पाटेकर यांचं पत्नीपासून दूर राहण्यामागचं कारण तरी काय?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि पत्नी नीलकांती पाटेकर गेल्या 35 वर्षांपासून वेगळे का राहतात? काय आहे नेमकं कारण?

घटस्फोट न घेता 35 वर्षे वेगळं राहिले.. नाना पाटेकर यांचं पत्नीपासून दूर राहण्यामागचं कारण तरी काय?
| Updated on: Jun 08, 2026 | 7:14 PM
Share

Nana Patekar : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या दमदार अभिनय, प्रभावी आवाज आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यांची वैयक्तिक आयुष्याची कहाणीही अनेकदा चर्चेत असते. विशेष म्हणजे, नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला नसतानाही ते गेली सुमारे 35 वर्षे स्वतंत्रपणे राहत आहेत. त्यांच्या नात्याबाबत अनेकांना उत्सुकता असते.

नीलकांती पाटेकर यांनी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 1966 मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्या बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी मराठी अभिनेत्री आणि लेखिका म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. काही काळ त्यांनी मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अलीकडेच त्यांनी छावा या चित्रपटातून पुनरागमन केले. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत विकी कौशल झळकला होता.

थिएटरमधून सुरू झाली प्रेमकहाणी

नाना पाटेकर आणि नीलकांती यांची पहिली भेट थिएटरमध्ये झाली होती. नाटकाच्या माध्यमातून दोघांची ओळख वाढली आणि हळूहळू त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले. काही वर्षांच्या सहवासानंतर 1978 मध्ये त्यांनी विवाह केला.

लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. दुर्वासा पाटेकर आणि मल्हार पाटेकर. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःखही आले. मोठा मुलगा दुर्वासा हा गंभीर आरोग्य समस्यांनी त्रस्त होता. अवघ्या अडीच वर्षांच्या वयात त्याचे निधन झाले. या घटनेचा दोघांवरही मोठा मानसिक परिणाम झाला.

घटस्फोट नाही, पण 35 वर्षांपासून वेगळे वास्तव्य

नाना पाटेकर आणि नीलकांती पाटेकर यांनी आजपर्यंत घटस्फोट घेतलेला नाही. तरीही ते गेली अनेक दशके वेगवेगळे राहत आहेत. काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी यामागचे कारण स्पष्ट केले होते.

त्यांच्या मते, दोघांच्या स्वभावात आणि विचारसरणीत खूप फरक होता. वैवाहिक नाते टिकवून ठेवताना सतत मतभेद होण्यापेक्षा परस्पर संमतीने स्वतंत्र राहणे हा अधिक योग्य पर्याय असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया