AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat- Anushka: विराट-अनुष्काने का सोडलं भारत? माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितलं खरं कारण

Virat Kohli- Anushka Sharma: क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे परदेशात का राहायला गेले, यामागचं कारण माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने यांनी सांगितलं आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या..

Virat- Anushka: विराट-अनुष्काने का सोडलं भारत? माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितलं खरं कारण
विराट कोहली- अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित- श्रीराम नेनेImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2026 | 7:56 AM
Share

Virat Anushka: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. मात्र, गेल्या काही काळापासून विराट-अनुष्का त्यांच्या दोन मुलांसह लंडनमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्या लंडनमध्ये स्थायिक होण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. पापाराझी कल्चर आणि सेलिब्रिटींना प्रायव्हसी मिळत नसल्याने या दोघांनी भारताबाहेर राहण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जात होतं. आता अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

भारतात यशाचा आनंद घेणं कठीण

श्रीराम नेने यांनी युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याशी झालेल्या भेटींच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी विराटचं कौतुक करत त्याला अत्यंत चांगला आणि नम्र व्यक्ती असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी अनुष्कासोबत झालेल्या एका संभाषणाचा उल्लेख केला. श्रीराम नेने यांनी सांगितलं, भारतात मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे विराट आणि अनुष्काला त्यांचं यश आणि वैयक्तिक आयुष्य मोकळेपणाने अनुभवणं कठीण होत होतं. ते कुठेही गेले किंवा त्यांनी काही केलं तरी लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं. त्यामुळे कुटुंबासोबत सामान्य आयुष्य जगण्यासाठी लंडनचा पर्याय त्यांना योग्य वाटला.

मुलांना द्यायचंय सामान्य बालपण

विराट आणि अनुष्कासाठी केवळ स्वतःची प्रायव्हसीच महत्त्वाची नसून, त्यांच्या मुलांचं बालपणही सामान्य पद्धतीने जावं अशी त्यांची इच्छा असल्याचं श्रीराम नेने यांनी सांगितलं. या जोडप्याला मुलगी वामिका आणि मुलगा अकाय अशी दोन मुलं आहेत. दोघांनाही सतत कॅमेऱ्यांच्या नजरेत न ठेवता तुलनेने शांत वातावरणात वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं या वक्तव्यातून स्पष्ट होतं.

श्रीराम नेने यांनी स्वतःच्या अनुभवाचाही दाखला दिला. प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जेवताना किंवा कुटुंबासोबत वेळ घालवतानाही सेल्फीसाठी होणाऱ्या विनंत्या कधी कधी त्रासदायक ठरू शकतात, असं त्यांनी सांगितलं. चाहत्यांचं प्रेम चुकीचं नसतं, मात्र प्रत्येक क्षणी प्रसिद्ध व्यक्ती म्हणून वावरावं लागणं ही मोठी मानसिक आणि सामाजिक किंमत असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं.

Follow Us
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?