AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चला हवा येऊ द्या’मधला विनोदवीर घेणार ब्रेक? कोण आहे तो विनोदवीर, काय आहे ब्रेकमागचं कारण?

'चला हवा येऊ द्या' हा लोकप्रिय कार्यक्रम लागला की सगळे आपल्या हातातले काम सोडून टीव्ही समोर येऊन बसतात. 'चला हवा येऊ द्या'नं अवघ्या महारष्ट्राला भुरळ घातली आहे. त्यांची कार्यक्रमाची जादू काही अजबच आहे. अवघा महाराष्ट्र या कार्यक्रमाला डोक्यावर घेतो. मात्र, या लोकप्रिय कार्यक्रमातील एक विनोदवीर ब्रेक घेणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

'चला हवा येऊ द्या'मधला विनोदवीर घेणार ब्रेक? कोण आहे तो विनोदवीर, काय आहे ब्रेकमागचं कारण?
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 1:49 PM
Share

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम लागला की सगळे आपल्या हातातले काम सोडून टीव्ही समोर येऊन बसतात. ‘चला हवा येऊ द्या’नं अवघ्या महारष्ट्राला भुरळ घातली आहे. त्यांची कार्यक्रमाची जादू काही अजबच आहे. अवघा महाराष्ट्र या कार्यक्रमाला डोक्यावर घेतो. मात्र, या लोकप्रिय कार्यक्रमातील एक विनोदवीर ब्रेक घेणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र, या कार्यक्रमात तो विनोदवीर कोण आहे. याबद्दल सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘चला हवा येऊ द्या’मधील सागर कारंडेनं (Sagar karande) सर्वांना खळखळून हसवलं आहे. महाराष्ट्रातील घराघरामध्ये सागर पोहचलाय. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात कधी पोस्टमन काका बनून सागरनं रडवलं देखील आहे. मात्र, आता सागर ब्रेक घेणार असल्याचं बोललं जातंय. या मागचं कारणही समोर आलं आहे. सागर, श्रेया बुगडे, (Shreya Bugade) भाऊ कदम, (Bhau kadam)) यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जी रंगत आणली आहे ती काही वेगळीच आहे. पण, याच टीममधील सागर कारंडेच्या ब्रेक घेण्यासंदर्भातली चर्चा सध्या रंगली आहे.

सागरचा प्रवास नाटकाच्या दिशेनं? सागरनं नुकतचं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सागरनं ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. या नाटकात सागर सध्या काम करत आहे. या फोटोवर महाराष्ट्रातील शहारांची नावे लिहीली आहे. तर 100 टक्के मनोरंजन, 100 टक्के उपस्थिती आणि 100 टक्के गंमत असंही यात दिसून येतं. हीच तर फॉमिलीची गंमत आहे या नाटकाची ‘फॅमिली आमची, मनोरंजन तुमचं’ ही टॅगलाईन आहे. या फोटोसह सागरनं त्याला कॅप्शन देखील दिलं आहे. त्यामध्ये सागरनं नाटकाचा प्रयोग कधी होणार आहे आणि त्याची वेळ काय आहे, याची देखील माहिती दिली  आहे.

कार्यक्रमाकडे पाठ की छोटा ब्रेक

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह अवघ्या देशानं डोक्यावर घेतले आहे. राजकीय नेत्यांना देखील चला हवा येऊ द्या च्या सेटवर हजेरी लावली आहे. आता या सगळ्यात सागर कारंडेनं एक पोस्ट केली आणि त्याच्या ब्रेकविषयीच्या चर्चा सुरु झाल्या. सागरनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांना वेगवेगळे प्रश्न पडले आहेत. आता सागर ‘चला हवा येऊ द्या’ मधून ब्रेक घेणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र त्यानं याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. सागरचे महिनाभराचे शेड्युल पाहता सागर नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तो ‘चला हवा येऊ द्या’ मधून ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे. आता सागर कारंडे नाटकामुळे व्यस्त असल्यानंही ब्रेक घेऊ शकतो. आता यावर सागर कारंडेनं प्रतिक्रिया देऊन चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांचं निरसन करायला हवं.

इतर बातम्या

Salman Khan| भाईजान लग्न करेना अन् चर्चा काही थांबेना! सलमान आणि सोनाक्षीचा शुभविवाह? मग काय आहे ‘त्या’ फोटोमागचं सत्य?

Allu Arjun | ‘पुष्पा’स्टार अल्लू अर्जुनकडून गेला ‘आइकन’, काय आहे चित्रपट गमावण्याचं कारण, अल्लू अर्जुन सध्या काय करतोय!

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू....
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू.....
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार.