AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांच्या या गोष्टीची काळजी घेतल्यास, हसत-खेळत करु शकाल संसार; प्रसिद्ध अभिनेत्रीचा सल्ला चर्चेत

दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांची मुलगी सोहा अली खानला तिच्या लग्नापूर्वी एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. सुखी संसारासाठी आईने दिलेला हा मंत्र आजही कामी येतो, असं सोहा म्हणाली. हा सल्ला नेमका काय होता, ते वाचा..

पुरुषांच्या या गोष्टीची काळजी घेतल्यास, हसत-खेळत करु शकाल संसार; प्रसिद्ध अभिनेत्रीचा सल्ला चर्चेत
marriage
| Updated on: Jul 17, 2025 | 11:45 AM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांची गणना त्यांच्या काळातील सर्वांत प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्यांनी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार मंसूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांनी करिअरचा त्याग न करता संसार आणि काम या दोन्ही गोष्टी सांभाळल्या. हे संतुलन राखण्यासाठी त्यांच्याकडे एक खास मंत्र होतं. सुखी संसाराचा हाच मंत्र त्यांनी लेक सोहा अली खानलाही तिच्या लग्नाच्या वेळी दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोहाने याचा खुलासा केला.

अभिनेत्री सोहा अली खानने कुणाल खेमूशी लग्न केलंय. या दोघांना एक मुलगी आहे. आईच्या खास मंत्राविषयी सांगताना ती म्हणाली, “एका स्त्रीने पुरुषाच्या अहंकाराची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि पुरुषाने स्त्रियांच्या भावनांची. जर तुम्ही हे करू शकलात, तर तुमचं नातं फार काळापर्यंत मजबूत राहील. आजच्या काळात जरी लोक असं म्हणत असेल की, पुरुषांनाही भावना असतात आणि स्त्रियांनाही अहंकार असतो. परंतु माझ्या आईची शिकवण मला आजही खूप कामी येते. वैवाहिक नातं जपणं हे अनेकदा आव्हानात्मक असतं. त्यासाठी फक्त पार्टनरशिपची नाही तर मैत्रीचीही गरज असते. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट फक्त जोडीदाराशी शेअर करत असाल, तर त्या नात्यावर गरजेपेक्षा जास्त ताण येऊ शकतो.” आयुष्यात फक्त पतीच सर्वस्व असू नये, तर मैत्रीसारखी इतर नातीही तेवढीच महत्त्वाची असतात, असं मत सोहाने यावेळी मांडलं.

View this post on Instagram

A post shared by Soha (@sakpataudi)

याच मुलाखतीत अभिनेत्री नेहा धुपियासुद्धा उपस्थित होती. लग्नाच्या वेळी सोहानेही तिला खास सल्ला दिल्याचं नेहाने सांगितलं. “सोहाने मला समजावून सांगितलं होतं की पुरुषांचा इगो (अहंकार) खूप नाजूक असतो. त्यामुळे विचारपूर्वक बोललं पाहिजे. एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. मी हळूहळू या गोष्टी शिकले की कोणत्या गोष्टींवर भांडलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींबाबत गप्प राहाला पाहिजे. पती-पत्नीच्या नात्यात मैत्री टिकवून ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे”, असं ती म्हणाली. नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलंय.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.