AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृतिक-सुझानने का घेतला घटस्फोट? 12 वर्षांनंतर भावाने सांगितलं कारण; म्हणाला “लोकांना खूप विचित्र..”

हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी 2000 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना रेहान आणि हृधान अशी दोन मुलं आहेत. सुझानचा भाऊ झायेद त्यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

हृतिक-सुझानने का घेतला घटस्फोट? 12 वर्षांनंतर भावाने सांगितलं कारण; म्हणाला लोकांना खूप विचित्र..
हृतिक रोशन-सुझान खान आणि झायेद खानImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2026 | 1:07 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चा ज्या घटस्फोटाची झाली असेल तर ती अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांची. लग्नाच्या 14 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. सेलिब्रिटींमधील हे सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक होतं. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. परंतु घटस्फोटानंतरही त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली नाही. किंबहुना दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेले असून त्यांच्यातील मैत्री कायम ठेवली आहे. आता सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खान हा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक आणि बहीण सुझान यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. बरेच प्रयत्न केल्यानंतरही काही गोष्टी जुळून येत नाहीत, अशी खंत त्याने बोलून दाखवली.

का घेतला घटस्फोट?

“हे घडायला पाहिजे नव्हतं. परंतु जी गोष्ट एकमेकांसाठी नाही, त्याला धरून बसल्यावर परिस्थिती आणखी वाईट झाली असती. नात्यात दोघांना त्रास होऊ लागतो. हा त्रास कशाला करून घ्यायचा? तुम्हाला मुलं आहेत, ज्यांच्या भविष्याकडे तुम्ही पाहू शकता, त्यांच्या आयुष्यात सहभागी होऊ शकता, त्यांना लहानाचं मोठं होताना पाहू शकता, त्या मुलांना चांगल्या व्यक्तीत परिवर्तन होताना बघू शकता. या सर्व गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलंय”, असं झायेद ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

याविषयी त्याने पुढे सांगितलं, “घटस्फोट झालाय आणि त्या गोष्टी आता संपल्या आहेत. आता पुढच्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत करणं आणि स्वत:च स्वत:चा आनंद शोधणं महत्त्वाचं आहे. आमचं कुटुंब सोसायटीच्या किंवा समाजाच्या दबावाखाली येऊन जगणारं नाहीये. अशा गोष्टींबद्दल आम्ही थोडे अधिक समजूतदार आणि थोडे अधिक सुशिक्षित आहोत. मला माहीत आहे की सर्वसाधारणपणे लोकांना हे खूप विचित्र वाटतं. काही तरुण असतात, काही जण स्वत:च दु:खी असतात, काही लोकांना ते समजतच नाही आणि ते ठीक आहे. काही हरकत नाही.”

आयुष्यात पुन्हा प्रेम मिळवण्याबद्दल काय म्हणाला झायेद?

घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. एकीकडे हृतिक हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. तर दुसरीकडे सुझान ही अर्सलान गोणीच्या प्रेमात आहे. याविषयी झायेद म्हणाला, “मला असं वाटतं की प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे. त्यांच्या मनात एकमेकांविषयी असलेला आदर आणि काळजी त्याहूनही अधिक अर्थपूर्ण आहे. त्यांना खूप छान जोडीदार मिळाले आहेत. मला सबा खूप आवडते आणि ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे.”

“आयुष्य पुढे जातच राहतं. त्यांनी जे काही सहन केलंय, ते मी शब्दांत मांडू शकत नाही. पण ज्याप्रकारे त्यांनी परिस्थिती हाताळली, ज्या प्रकारे ते पुढे गेले आणि आयुष्याच्या या प्रवासात पुन्हा प्रेम शोधत त्यांनी जे काही मिळवलं, त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. हे खूप कठीण आहे. शेवटी, मुद्दा काय आहे? तुम्ही विश्वास ठेवू शकाल अशी व्यक्ती सोबत असणं, हे महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असतो असं मला वाटतं. जर तुमच्या पाठिशी कोणी एक खंबीर व्यक्ती नसेल तर तुम्ही या जगात कसं वावरणार”, अशा प्रश्न झायेदने विचारला आहे.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा