.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशी खेळाडूंचा उन्माद, विजयानंतर भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की

अंतिम सामना जिंकल्याच्या जोशात बांगलादेशच्या खेळाडूंचा स्वत:वरचा ताबा सुटला. आनंद साजरा करताना त्यांनी मैदानातील भारतीय खेळाडूंना शिविगाळ केली (Bangladesh players misbehave with Indian players).

बांगलादेशी खेळाडूंचा उन्माद, विजयानंतर भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 10, 2020 | 7:36 PM
Share

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात रविवारी (9 फेब्रुवारी) 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सनी टीम इंडियाचा पराभव केला. अंतिम सामना जिंकल्याच्या जोशात बांगलादेशच्या खेळाडूंचा स्वत:वरचा ताबा सुटला. आनंद साजरा करताना त्यांनी मैदानातील भारतीय खेळाडूंना शिवीगाळ केली. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाली. याप्रकरणावरुन बांगलादेशच्या खेळाडूंवर जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून टीका केली जात आहे (Bangladesh players misbehave with Indian players).

सामना सुरु असताना बांगलादेशचे खेळाडू भारतीय फलंदाजांशी गैरवर्तवणूक करत होते. बांगलादेशचा गोलंदाज शोरीफुल इस्लाम हा प्रत्येक चेंडूनंतर भारतीय फलंदाजांशी हुज्जत घालत होता. तो त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता. सामना अंतिम टप्प्यावर असताना शोरीफुलची मग्रुरी कॅमेऱ्यातही कैद झाली. सामना जिंकल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानावर उत्साह साजरा करत असताना भारतीय फलंदाजांना शिवीगाळ केली.

याप्रकरणी बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने दिलगीरी व्यक्त केली आहे. सामना जिंकल्यानंतर जे झालं ते दुर्देवी होतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. “आमचे काही गोलंदाज अतिउत्साही झाले आणि त्यातून त्यांच्याकडून हा सर्व प्रकार घडला. खरंतर मी टीम इंडियाचं अभिनंदन करतो”, असं अकबर म्हणाला (Bangladesh players misbehave with Indian players).

दरम्यान, आयसीसीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असल्याची माहिती अंडर 19 टीम इंडियाचे मॅनेजर अनिल पटेल यांनी दिली. “सामन्याच्या शेवटच्या क्षणाचे व्हिडीओ फुटेज बांगलादेशच्या खेळाडूंच्या गैरवर्तन केल्याची साक्ष आहे”, असं पटेल म्हणाले. तर टीम इंडियाचा कर्णधार प्रियम गर्गने बांगलादेशच्या खेळाडूंची वागणूक चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा