AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसाठी स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची घोषणा करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता असल्याचं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं (Jitendra Awhad Demands Separate Package for Mumbai in battle against Corona)

मुंबईसाठी स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची घोषणा करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी
| Updated on: May 14, 2020 | 3:50 PM
Share

मुंबई : देशात कर रुपाने सर्वात जास्त पैसा मुंबईतून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. (Jitendra Awhad Demands Separate Package for Mumbai in battle against Corona)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा मंगळवारी केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याविषयी तीन दिवस विस्तृत माहिती देत आहेत.

“भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररुपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होतो. पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ” असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

हेही वाचा : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटींचे विना हमी कर्ज, गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) कुटीर उद्योग आणि गृह उद्योगांना कुठलीही मालमत्ता तारण न ठेवता 3 लाख कोटी रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज देण्यात येणार आहे, अशी घोषणा काल निर्मला सीतारमण यांनी केली. यामुळे 45 लाख उद्योगांना पुन्हा कामकाज सुरु करता येईल आणि रोजगारदेखील सुरक्षित राहतील.

‘कोरोना’मुक्त जितेंद्र आव्हाड

‘कोरोना’शी यशस्वी झुंज दिल्याने जितेंद्र आव्हाड यांना अवघ्या काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. आव्हाडांनी आपल्या प्रकृतीविषयी ट्विटरवरुन माहिती देत उपचार करणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांचे आभार व्यक्त केले होते.

(Jitendra Awhad Demands Separate Package for Mumbai in battle against Corona)

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.