AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND : दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची नामुष्की

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका आयर्लंडने 2-0 ने जिंकली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आर्यलंडने भारतीय संघाला धावांनी पराभूत केलं.

IRE vs IND : दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची नामुष्की
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 28, 2026 | 10:22 PM
Share

टी20 वर्ल्डकप विजेत्या संघावर दुबळ्या आयर्लंडकडून पराभवाची नामुष्की ओढावली आहे. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत आयर्लंडने भारतीय संघाला 2-0 ने पराभूत केलं आणि व्हाईटवॉश दिला. क्रिकेट इतिहासात आयर्लंडने भारतीय संघाला पहिल्यांदाच टी20 क्रिकेटमध्ये व्हाईटवॉश दिला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघावर दुबळ्या संघाकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. संघात दिग्गज खेळाडूंची भरणा असूनही पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भारतीय संघावर लाजिरवाण्या पराभवाची नोंद झाली आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आयर्लंडने 20 षटकात 8 गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही भारतीय संघाला गाठता आलं नाही. हे आव्हान गाठताना भारतीय संघाला 153 धावा करता आल्या आणि हा सामना 1 धावेने गमावला.

आयर्लंडने दिलेल्या 155 या विजयी धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद झाले. त्यांना खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियावर दबाव वाढला. इशान किशन 12, श्रेयस अय्यर 10, अक्षर पटेल 14, शिवम दुबे 20, सूर्यांश शेडगे 1 धावा करून बाद झाले. भारताकडून तिलक वर्माने 46 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत 55 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. हार्षित राणाने 10 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 21 धावांची खेळी करून बाद झाला.

शेवटच्या षटकात काय झालं?

भारताला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. हार्षित राणा आणि अर्शदीप सिंग मैदानात होते. स्ट्राईकला असलेल्या अर्शदीप सिंगला पहिला चेंडू वाइड मिळाला. त्यानंतरच्या चेंडूवर 1 धाव आली. दुसरा चेंडू नो बॉल टाकला आणि 2 धावा आल्या. त्यामुळे 5 चेंडूत 15 धावा अशी स्थिती आली. फ्री हिट असलेल्या चेंडूवर हार्षित राणाने चौकार मारला आणि 4 चेंडूत 11 धावा अशी स्थिती आली. तिसऱ्या चेंडूवर हार्षित 1 धाव काढली. हॅरी टेक्टरने चौथा चेंडू वाइड टाकला, म्हणून हा चेंडू पुन्हा टाकण्याची वेळ आली. तसेच एक अतिरिक्त धावा मिळाली. पुन्हा टाकलेल्या चौथ्या चेंडूवर 1 धाव मिळाली आणि 2 चेंडू 8 धावांवर स्थिती आली. पाचव्या चेंडूवर हार्षित राणाची विकेट गेली आणि सामना आयर्लंडच्या पारड्यात झुकला. प्रिन्स यादवने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. पण हा सामना भारताने एका धावेने गमावला.

पहिल्या टी20 सामन्यात काय झालं?

पहिल्या टी20 सामन्यात आयर्लंडने भारतीय संघा 34 धावांनी पराभूत केलं होतं. या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावा दिल्या होत्या. पण भारतीय संघाला 18.5 षटकात सर्व गडी गमवून 148 धावांपर्यंत मजल मारता आली होती. या सामन्यात अभिषेक शर्मा वगळता इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा