AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लड शुगर सतत वाढतेय, मग ‘हे’ घरगुती उपाय देतील चुटकीसरशी आराम

मधुमेह हा आजार लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. त्यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे फार महत्त्वाचे असते. आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत.

ब्लड शुगर सतत वाढतेय, मग 'हे' घरगुती उपाय देतील चुटकीसरशी आराम
मधुमेहाचा त्रास कसा नियंत्रणात ठेवाल?
| Edited By: | Updated on: Nov 09, 2024 | 8:15 AM
Share

Home Remedies To Control Blood Sugar : अनियमित दिनचर्या, असंतुलित खाणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मधुमेह हा आजार लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. त्यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे फार महत्त्वाचे असते. जर ती सातत्याने वाढत असेल तर त्याचा तुमच्या शरीरातील किडनीवर आणि हृदयावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत.

दररोज व्यायाम करा : तुम्ही जर नियमित व्यायाम केला तर तुमची रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहील. व्यायाम केल्याने स्नायूंमध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा : फायबर हे रक्तातील साखरेची पातळी राखून ठेवण्यास मदत करते. आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. हिरव्या भाज्या, फळे आणि शेंगदाणे यांचे भरपूर प्रमाणात सेवन करा यामुळे साखरेची पातळी कमी होते.

भरपूर पाणी प्या : पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे टाळण्यासाठी दिवसभरात किमान तीन ते चार लीटर पाणी प्यावे. कारण किडनी हे अतिरिक्त साखर बाहेर काढून टाकण्यास मदत करते.

पुरेशी झोप घ्या : आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. खरं तर झोपेच्या कमतरतेमुळे सुद्धा रक्तातील साखरेच्या पातळी वाढ होते. त्यामुळे दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

ताण घेऊ नका : ताणतणावाचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेवर होतो. ताणतणावातून सुटका मिळवायची असेल, तर रोज मेडिटेशन आणि योगा करावा. यामुळे तुम्ही तणावापासून मुक्त व्हाल. तुम्हाला आतून ताजेपणा जाणवेल.

वजन नियंत्रणात ठेवा : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आहार आणि नियमित व्यायामाने आपले वजन नियंत्रित करा. यामुळे तुम्हाला मधुमेहाचा त्रास होणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.