AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दातांचं आरोग्य वाचवायचंय? मग गोड पेयांबाबत घ्या ‘ही’ खबरदारी

दात सडण्याचं कारण फक्त चॉकलेट, टॉफी किंवा चिप्स आहेत असं तुम्हाला वाटतंय? मग आजच सावधान व्हा! चला, जाणून घेऊया कोणती कारणं दात सडण्याला जबाबदार आहेत आणि पालकांनी याबाबत कोणती माहिती लक्षात ठेवून विशेष काळजी घ्यायला हवी.

दातांचं आरोग्य वाचवायचंय? मग गोड पेयांबाबत घ्या 'ही' खबरदारी
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 10:45 PM
Share

नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) तज्ज्ञांनी पालकांना एक महत्वाचा इशारा दिला आहे. तुम्हाला वाटत असेल की फक्त चॉकलेट, टॉफी, बिस्किट आणि चिप्सच दात खराब करतात, तर तुम्ही चुकीचे आहात. एम्सच्या तज्ज्ञांच्या मते, गोड दूध आणि फळांचा ज्यूसदेखील दातांना तितकेच नुकसान पोहोचवू शकतात, विशेषतः जेव्हा मुले हे वारंवार घेतात आणि त्यानंतर दात साफ करत नाहीत.

हेल्दी ड्रिंक की धोका?

पालकांना वाटते की मुलांना दूध आणि ज्यूस वारंवार देणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. पण एम्सच्या दंत तज्ज्ञांच्या मते, दिवसातून अनेकदा दूध आणि ज्यूस पिणे हे दातांसाठी धोकादायक ठरू शकते. हे पेय गोडसर असल्याने त्यातील साखर दातांवर चिकटून राहते आणि यामुळे कॅव्हिटी (दात सडणे) होण्याची प्रक्रिया सुरू होते.

हेल्दी स्माइल

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)**च्या दंत शिक्षण व संशोधन केंद्राने ‘हेल्दी स्माइल’ नावाचे मोबाइल अ‍ॅप लॉन्च केले आहे. यामध्ये मुलांच्या दातांची योग्य काळजी कशी घ्यावी, याविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. एम्स एक्सपर्ट्सनी पालकांना विशेषत: मुलांच्या दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

कधी आणि कशी होते कॅव्हिटी?

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा मूल दिवसभरात 3 वेळांपेक्षा जास्त वेळा गोड आणि चिकटणाऱ्या वस्तू (टॉफी, कँडी, बिस्किट, चिप्स, वेफर्स, गोड पेय दूध, ज्यूस, कोल्ड ड्रिंक, फ्रूटी) घेतं आणि दात घासत नाही, तेव्हा दात सडायला सुरुवात होते. जसजसे हे पदार्थ जास्त प्रमाणात घेतले जातात, तसतसे सडणं वाढतं आणि अखेर ते दातांना पूर्णपणे खराब करतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या फक्त लहान मुलांच्या दूधाच्या दातांपुरती मर्यादित नाही. सहा वर्षांनंतर येणारे कायमस्वरूपी दातसुद्धा या सडण्याच्या प्रक्रियेत अडकू शकतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे.

तज्ज्ञ सांगतात की, मुलांचे वय फक्त सहा महिने असले तरी त्यांच्या तोंडात आलेल्या पहिल्या दातांची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गोड काहीही खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करणं आवश्यक आहे. यामुळे केवळ दात सडण्यापासून बचाव होत नाही, तर तोंडातील बॅक्टेरिया वाढणंही थांबतं आणि दात निरोगी राहतात.

ही समस्या फक्त मुलांपुरती मर्यादित नाही. जर प्रौढांनीसुद्धा गोडसर पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर दात नीट स्वच्छ केले नाहीत, तर त्यांच्याही दातांमध्ये किड लागू शकतो. सकाळी आणि झोपण्यापूर्वी ब्रश न केल्यास दातांमध्ये सडणं वाढतं, जे नंतर त्रासदायक ठरू शकतं.

शेवटी काय कराल?

तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे गोड खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर दात नीट स्वच्छ करा, नियमित ब्रश करा आणि दंत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अगदी गोड दूध किंवा फळांचा ज्यूससुद्धा योग्य काळजी न घेतल्यास दातांसाठी हानिकारक ठरू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी