AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 रुपयांची केळी 70 रुपयांच्या नारळ पाण्याइतकी फायदेशीर? जाणून घ्या

तुम्हाला माहिती आहे की, डॉक्टर रुग्णाला दिवसातून नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण नारळाचे पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. गेल्या काही वर्षांत ते पिण्याचा ट्रेंडही वाढला आहे. पण तुम्हाला माहित आहे का 5 रुपयांची केळी नारळाइतकीच फायदेशीर आहे. जाणून घेऊया.

5 रुपयांची केळी 70 रुपयांच्या नारळ पाण्याइतकी फायदेशीर? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 3:10 PM
Share

नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण रुग्णाला भेटायला गेलो की नारळ पाणी देतो. डॉक्टर रुग्णाला दिवसातून नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण नारळाचे पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पण 5 रुपयांची केळी नारळाइतकीच फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर याचविषयी जाणून घेऊया.

गेल्या 4 ते 5 वर्षांत नारळाचे पाणी पिण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजार कोणताही असो, डॉक्टर रुग्णाला दिवसातून नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच नारळ पाणी प्यायला आवडतं, पण नारळाच्या पाण्याची किंमत 70 ते 80 रुपये आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक रुग्णाला ते परवडत नाही. पण एका केळीची किंमत फक्त पाच रुपये आहे. आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केळी तुम्हाला नारळाच्या पाण्याइतकेच पोषण देऊ शकते. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पण 5 रुपयांची केळी नारळाइतकीच फायदेशीर आहे.

केळी आणि नारळात काय फरक?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, नारळ पाण्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे केळीप्रमाणेच असतात. या दोघांचे पोषणमूल्य पाहिले तर अनेक बाबतीत नारळ पाण्यापेक्षा केळी उत्तम आहे. केळी आणि नारळाच्या पाण्यात एकच मोठा फरक आहे की नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवतो म्हणजेच पाण्याची कमतरता दूर करतो, तर केळीमध्ये ते नसते. याशिवाय विशेष फरक पडलेला नाही.

केळी नारळाच्या पाण्याइतकीच फायदेशीर?

श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या चीफ डायटीशियन प्रिया पालीवाल सांगतात की, नारळाचं पाणी आणि केळी हे दोन्ही पौष्टिक पदार्थांनी समृद्ध आहेत, पाहिलं तर दोन्हीमध्ये समान पोषक तत्वं आहेत. नारळाच्या पाण्यातील जीवनसत्त्वाचे प्रमाण केळीमध्ये तेवढेच असते. नारळाच्या पाण्यात कोलेस्टेरॉल नसते आणि केळीतही नसते. त्याचप्रमाणे, केळी आणि नारळ पाणी दोन्हीमध्ये पोटॅशियम असते, जे शरीरासाठी आवश्यक आहे, जरी केळी आणि नारळ पाण्यात काही फरक आहे.

नारळाच्या पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट असते. हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास, स्नायूंचा थकवा कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

केळी ऊर्जा देणारे फळ

केळी हे ऊर्जा देणारे फळ आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि फायबर असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया होण्यास मदत होते आणि पोट बराच काळ भरलेले राहण्यास मदत होते.

नारळाचे पाणी हायड्रेशनसाठी फायदेशीर

नारळ पाणी आणि केळीची तुलना केली तर हे स्पष्ट आहे की, दोघांमध्ये समान पोषक आहेत, परंतु त्यांचे प्रमाण आणि परिणाम भिन्न आहेत. नारळ पाणी प्रामुख्याने हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट संतुलनासाठी उपयुक्त आहे, तर केळी ऊर्जेचा चांगला स्रोत आहे आणि स्नायूंसाठी आवश्यक पोषण प्रदान करते. आपण डिहायड्रेटेड वाटत असल्यास, नारळ पाणी हा चांगला पर्याय आहे. ऊर्जेची गरज असेल तर केळी खाणं योग्य ठरेल, पण जर तुम्ही फक्त व्हिटॅमिनसाठी नारळाचं पाणी घेत असाल तर केळीही हेच काम करू शकते.

नारळाचे पाणी मधुमेहींसाठी चांगले

दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील मेडिसिन विभागातील डॉ. अजित कुमार सांगतात की, केळी आणि नारळाच्या पाण्यात जवळजवळ सारखेच पोषक प्रोफाईल असते. केवळ केळी पाण्याची कमतरता भरून काढू शकत नाही, मात्र मधुमेहाच्या रुग्णांना केळी न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे साखरेची पातळी वाढू शकते, होय, जर तुम्हाला मधुमेह नसेल आणि तुम्ही व्हिटॅमिन किंवा इतर कोणत्याही पोषक घटकांसाठी नारळाचे पाणी पित असाल तर केळीदेखील हेच करू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

Follow Us
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सत्तापालट ? रोहित शर्मा-नीता अंबानींच्या भेटीने चर्चांना उधाण.

Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सत्तापालट ? रोहित शर्मा-नीता अंबानींच्या भेटीने चर्चांना उधाण

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला