AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona update : देशात गेल्या 24 तासांत 20 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे नवे रुग्ण, राज्यात काय स्थिती जाणून घ्या

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 20,408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 54 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona update : देशात गेल्या 24 तासांत 20 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे नवे रुग्ण, राज्यात काय स्थिती जाणून घ्या
| Updated on: Jul 30, 2022 | 11:57 AM
Share

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 20,408  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 54 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची (patient) संख्या देखील मोठी आहे.शुक्रवारी दिवसभरात 20,958 रुग्णांनी कोरोनावर (Corona update) मात केलीये. सध्या देशात एकूण 143 384 इतके सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 98.48 टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत एकूण 4.33 कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 87.48 कोटी चाचण्या केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. दुसरीकडे भारतात सध्या लसीकरणाच्या मोहिमेला देखील वेग आला आहे. आतापर्यंत एकूण 203.94 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.यासोबतच 12 ते 14 वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण सुरू असून, या गटात एकूण 3.89 कोटी लसींच्या मात्र देण्यात आल्या आहेत.

राज्यात काय स्थिती?

राज्यात परभणी आणि नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना आढळून येत आहेत. गेल्या 7 दिवसांत परभणी जिल्ह्यात 43 ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परभणीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 10 रुग्ण आढळलेत. तर शुक्रवारी 9 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात 22 ते 28 जुलैदरम्यान एकूण 578 तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 43 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तर दुसरीकडे नांदेड जिल्हयात देखील गेल्या 24 तासांत सतरा व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत, सध्या नांदेडमध्ये कोरोनाचे 44 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील कमी अधिक प्रमाणात अशी स्थिती आहे.

नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 20,408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 54 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे संकट ओसरले होते, मात्र आता हळूहळू पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हवे असे देखील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Follow Us
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण