AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेलाच्या पानांचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

बेलाची पाने ही केवळ पूजेसाठीच वापरली जात नाहीत तर त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. तर आजच्या लेखात आपण बेलाच्या पानांची आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

बेलाच्या पानांचे 'हे' आहेत 5 जबरदस्त फायदे, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
bel leafImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 9:57 PM
Share

भगवान शंकराची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानांचा अधिक वापर केला जातो. बहुतेक जण बेलपत्र फक्त धार्मिक विधींशी जोडतात, परंतु आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय पाककृतींमध्ये सुद्धा बेलाच्या पानांना खूप महत्त्व आहे. बेल वृक्ष धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो कारण ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याच्या पानांमध्ये आढळणारे नैसर्गिक संयुगे शरीराला थंड करण्यास, पचन सुधारण्यास, रक्तातील साखर संतुलित करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बेलपत्र विविध प्रकारे वापरले जाऊ शकते.

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकं नैसर्गिक आणि चविष्ट पदार्थ शोधतात. या संदर्भात बेलची पाने हा एक उत्तम पर्याय आहे. या लेखात, आरोग्य आणि चव दोन्ही देणाऱ्या बेलची पानांचा वापर आरोग्यासाठी कसा केला जाऊ शकतो ते जाणून घेऊयात.

बेलाच्या पानांचा हर्बल टी

अनेकांना बेलाच्या पानांचा हर्बल टी आवडतो. या हर्बल टी ची चव चांगली असतेच त्याचबरोबर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आयुर्वेद तज्ञ सांगतात की हे हर्बल टी पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासाठी पचनाची समस्या दूर करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी हे हर्बल टी प्यावे. बेलाच्या पानांचा हर्बल टी बनवण्यासाठी 4 ते 5 ताजी बेलाची पाने धुवून घ्या. आता एक ग्लास पाण्यात ही पाने टाकून 5 ते 7 मिनिटे उकळवा. त्यानंतर तयार हर्बल टी मध्ये तुम्ही थोडे मध किंवा लिंबाचा रस मिक्स करून सेवन करू शकता. यामुळे पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच चयापचय देखील सुधारते.

बेलच्या पानांची चटणी देखील एक चांगला पर्याय

बाजारामध्ये बेलची पाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तुम्ही त्याची चटणी बनवूनही ती खाऊ शकता. बेलाच्या पानांपासून तयार चटणी चविष्ट आणि आरोग्यदायी दोन्ही आहे. तर चटणी बनवण्यासाठी बेलची पाने, धणे, पुदिन्याची पाने, आले, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि थोडेसे खडे मीठ हे सर्व मिश्रण एकत्र करून वाटून घ्या. आता तयार चटणी योग्य प्रमाणातच खावी. ही चटणी खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते, भूक वाढते आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत होते.

बेलच्या पानांचा काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

तुमची जर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही बेलाच्या पानांचा काढा बनवून प्या. तज्ञांचे म्हणणे आहे की बेलाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी1, बी6, कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात, जे बदलत्या ऋतूंमध्ये सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करण्यास मदत करतात. तर हा काढा बनवण्यासाठी बेलपत्र, तुळस, काळी मिरी आणि आले हे सर्व गोष्टी अंदाजे पाण्यात टाकून उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून घ्या. जर चव खूप कडू असेल तर तुम्ही थोडे मध मिक्स करून या काढ्याचे सेवन करा.

बेलाच्या पानांची पावडर बनवा आणि वापरा

तुम्ही बेलाच्या पानांची पावडर देखील बनवू शकता आणि ही तयार पावडर बराच काळ साठवून ठेवता येते. तर बेलाच्या पानांची पावडर बनवण्यासाठी बेलाची पाने घ्या, ती कडक उन्हात वाळवा आणि नंतर बारीक पुड तयार करा. बेलाच्या पानांची पावडर उन्हाळ्यात वापरण्यासाठी उत्तम आहे. तसेच बेलाच्या पानांचा वापर शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. म्हणून, उन्हाळ्यातील उष्णतेमध्ये किंवा उष्णतेच्या लाटेत, तुम्ही ही पावडर ताक किंवा दह्यामध्ये मिक्स करू शकता. यामुळे आम्लता कमी होते आणि पोटात जळजळ आणि जडपणापासून आराम मिळतो.

बेल पत्रा डिटॉक्स वॉटर

बेलची पाने डिटॉक्स वॉटर म्हणून देखील वापरली जाऊ शकतात. प्रथम, बेलची पाने रात्रभर पाण्याच्या बाटलीत टाकून ठेवा. सकाळी दिवसभर हे पाणी प्या. यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तज्ञांचा असा सल्ला आहे की गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी बेलची पाने खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.