AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मुलीचा मृत्यू, एक हजार कोटी भरपाई द्या, औरंगाबादच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात याचिका!

लसीच्या दुष्परिणामांमुळेच मुलीचा मृत्यू झाला असून शासनाचे दावे खोटे ठरल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बेफिकीर सरकारी यंत्रणांकडून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचे दीपक लुनावत यांनी सांगितले.

कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मुलीचा मृत्यू, एक हजार कोटी भरपाई द्या, औरंगाबादच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात याचिका!
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 6:40 PM
Share

औरंगाबादः कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे (Corona Vaccination Side effects) मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा औरंगाबादच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी वडिलांनी केंद्र व राज्य सरकारकडून (Maharashtra Government) एक हजार कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर मुलीला कोविशील्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आल्यानंतर काही दिवसांनी तिचा मृत्यू झआला होता. त्यामुळे या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारसह सिरम इन्स्टिट्यूटला प्रतिवादी केले आहे. त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी याचिकाकर्त्याने हायकोर्टात केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

औरंगाबाद येथील दिलीप लुनावत यांची मुलगी स्नेहल ही नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 28 जानेवारी 2021 रोजी तिने कोविशील्ड लसीचा डोस घेतला होता. मात्र त्याच्या दुष्परिणामांमुळे 1 मार्च 2021 रोजी तिचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. कोरोनावरील लस सुरक्षित असल्याचे खोटे आश्वासन भारतीय औषध महानियंत्रक (DCDI), अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संचालक तसेच केंद्र व राज्य सरकारने सांगितल्याने माझ्या मुलीसारख्या आरोग्य क्षेत्राशी संबंधितांना लस घेण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मुलाचा मृत्यू कोविशील्डच्या दुष्परिणामांमुळे झाला, हे शासनालाही मान्य असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. लसीकरणानंतरच्या प्रतिकुल घटनांच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीनेही हे मान्य केल्याचे याचिकेत म्हटले आहे.

‘शासनाचे दावे खोटे, एक हजार कोटी भरपाई हवी’

कोरोनावरील लस आल्यानंतर आरोग्य सेवेशी संबंधित सर्वांनी लसीकरणाला प्राधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार आपल्या मुलीनेही लसीच्या दोन्ही मात्र महाविद्यालयातच घेतल्या होत्या. ही लस पूर्ण सुरक्षित आहे, यामुळे शरीराला कोणताही धोका नाही, असे मुलीला सांगण्यात आले होते. मात्र या लसीच्या दुष्परिणामांमुळेच मुलीचा मृत्यू झाला असून शासनाचे दावे खोटे ठरल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बेफिकीर सरकारी यंत्रणांकडून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचे दीपक लुनावत यांनी सांगितले. यासाठी प्रतिवादींकडून एक हजार कोटी रुपयांची भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

इतर बातम्या-

Nitesh Rane arrest : भाजप आमदार नितेश राणेंना अखेर 2 दिवसांची पोलीस कोठडी! दिवसभरात नेमकं काय घडलं?

भजे घेण्यासाठी रेल्वेतून उतरला खाली अन् ट्रेन सुरु झाली! पुढे जे घडलं ते चांगलंच अंगलट आलं…

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.