AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र किंवा देशात लॉकडाऊन लागू शकतो का?; डॉ. अविनाश भोंडवे नेमकं काय म्हणाले?

मृत्यूची संख्या वाढली, खूप लोक बाधित झाले, रुग्णालय भरू लागले तरच लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. पण आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार आजार वाढतो.

महाराष्ट्र किंवा देशात लॉकडाऊन लागू शकतो का?; डॉ. अविनाश भोंडवे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र किंवा देशात लॉकडाऊन लागू शकतो का?; डॉ. अविनाश भोंडवे नेमकं काय म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 22, 2022 | 1:37 PM
Share

पुणे: चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसने हाहाकार उडवला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी खाटाच शिल्लक राहिलेल्या नाहीयेत. रुग्णांवर जमिनीवरच उपचार केले जात असून मृतदेहही जमिनीवरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे चीनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचा हा व्हायरस चीनमधून थेट अमेरिका आणि जपानसह अनेक देशात पोहोचला असून त्यामुळे तिथेही हाहाकार उडाला आहे. भारतानेही या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

ओमिक्रॉनचा हा सब व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट सौम्य समजला जात होता. पण त्याचा संसर्ग वेगाने होतो. हा मूळच्या कोरोनापेक्षा 18 पट वेगाने पसरतो. त्यामुळे तो अनेकांना वेगाने होतो. त्याची मारक शक्ती जास्त नाहीये. आता गेल्या काही दिवसात चीनमधून जे व्हिडीओ आलेत त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे, असं आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.

भारतात हा आजार आला आहे. भारतात 130 ते 135 पेशंट सापडल्याची बातमी आहे. सर्दी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत. पण तीन ते पाच दिवसात हा आजार पूर्ण बरा होतो. ज्यांनी आधी लस घेतली असली तरी त्यांना हा आजार होतो. लस घेतली नसलेल्यांचा त्रास वाढू शकतो. लस घेतली असेल तर गंभीर आजार होत नाही, असं भोंडवे यांनी सांगितलं.

70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या व्हायरसची लागण पटकन होते. तसेच ज्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे त्यांनाही या आजाराचा अधिक त्रास होतो. आपल्याकडे पूर्ण लसीकरण झालं नाही. काहींचे दोनच डोस झाले आहेत. काहींचे तेही झाले नाही.

तर काहींचा तिसरा डोस झाला नाही. लसीकरणालाही वर्ष झालं आहे. त्यामुळे नव्याने चौथा डोस दिला पाहिजे. हा विषाणू या पुढेही येणार आहे. त्यापासून संरक्षण मिळेल याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

या आजारापासून बचाव करायचा असेल तर आधीचेच प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत. प्रतिबंधक उपाय म्हणजे गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, हात स्वच्छ धुवा. पण लॉकडाऊन सारखा कठोर उपाय वापरला जाऊ शकणार नाही.

लॉकडाऊन लागल्याने लोकांनी चीनमध्ये निदर्शने केली. त्यामुळे आपल्याकडे ही वेळ येऊ नये म्हणून लोकांनी प्रतिबंधक उपाय वापरले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

मृत्यूची संख्या वाढली, खूप लोक बाधित झाले, रुग्णालय भरू लागले तरच लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. पण आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार आजार वाढतो. मोठ्या प्रमाणात वाढला तरी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची वेळ येत नाही.

लोक होम आयसोलेशनमध्ये बरे होऊ शकतात. लोकांनी घाबरू नये. फार विशेष औषध लागत नाही. पण चीनच्या बातम्यांवर सरकारने बोललं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...