AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

fitness tips: उन्हाळ्यात ‘या’ वेळी चालल्यामुळे तुमंच लठ्ठपणा होईल झटपट कमी…

weightloss tips in summer: तंदुरुस्त राहण्यासाठी फिरायला जातात. उन्हाळ्याच्या हंगामातही लोक संध्याकाळी किंवा सकाळी फिरायला जातात. पण उन्हाळ्यात फिरायला जाण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? या लेखात आम्ही तुम्हाला सांगतो.

fitness tips: उन्हाळ्यात 'या' वेळी चालल्यामुळे तुमंच लठ्ठपणा होईल झटपट कमी...
fitness tipsImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 5:02 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्याकडे लक्ष नाही दिल्यामुळ तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. तुमच्या आहारात फायबर, कॅल्शियम आणि मिनरल्सचा समावेश केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यासोबतच दररोज व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते. त्यासोबतच व्यायाम करणे आणि चालल्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होते. जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते.

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात चालावे. लोक सामान्यतः वजन कमी करण्यासाठी किंवा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालतात. काही लोक सकाळी फिरायला जातात तर काही संध्याकाळी फिरायला जातात. चालण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे ताण कमी होतो, पचनसंस्था निरोगी राहते आणि शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. पण अनेकदा लोक उन्हाळ्यात चुकीच्या वेळी फिरायला जातात, ज्यामुळे त्यांना फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात फिरायला जाण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर या लेखात आम्ही तुम्हाला सांगतो की उन्हाळ्यात किती वाजता चालावे? तसेच, योग्य वेळ निवडल्याने शरीराला कोणते फायदे होतात. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळ. तुम्ही सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत फिरायला जाऊ शकता. यावेळी सूर्यप्रकाश, उष्णता आणि आर्द्रता कमी असते. जर तुम्हाला संध्याकाळी फिरायला आवडत असेल तर तुम्ही 6:30 नंतरच चालावे.

यावेळी सूर्य मावळतो आणि उष्णताही थोडी कमी होते. जर तुम्ही सकाळी 5 ते 7 च्या दरम्यान चाललात तर शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते, ज्यामुळे चयापचय देखील सुधारतो. यावेळी, वायू प्रदूषण कमी असते आणि हवामान देखील चांगले असते. मॉर्निंग वॉकमुळे पचनसंस्था देखील सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. संध्याकाळी चालण्याने शरीर थंड होते कारण सूर्यप्रकाश नसतो आणि हवामानातील उष्णता देखील थोडी कमी होते. संध्याकाळी चालणे दिवसभराचा थकवा आणि ताण कमी करण्यास देखील मदत करते.

चालताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी…

हायड्रेटेड रहा – जेव्हाही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाता तेव्हा नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि नियमित अंतराने पाणी पीत रहा. सतत चालण्यामुळे शरीराला घाम येतो ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. हात हलवा – बऱ्याचदा काही लोक चालताना हात हलवत नाहीत. तर चालताना हात हलत राहिले पाहिजेत. असे केल्याने संपूर्ण शरीर सक्रिय राहते.

मोबाईल फोन वापरू नका – काही लोकांना चालताना मोबाईल फोन वापरण्याची सवय असते, जी योग्य नाही. कारण मोबाईल फोन वापरताना चालताना खाली पाहणे तुमच्या शरीराची स्थिती बिघडू शकते.

डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार