AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : थंडीपासून वाचण्यासाठी ‘या’ पदार्थांचा खाण्यात करा समावेश, शरीर राहिल गरम!

Health News : शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी काही पदार्थांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपलं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होईल आणि आपले शरीर तंदुरस्त राहण्यास मदत होईल. तर आता आपण रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे, याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून हिवाळ्यात आपलं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होईल.

Health : थंडीपासून वाचण्यासाठी 'या' पदार्थांचा खाण्यात करा समावेश, शरीर राहिल गरम!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 28, 2023 | 10:16 PM
Share

मुंबई : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, तर थंडीच्या या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप असे आजार निर्माण होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे खूप गरजेचं असतं. मग आपले कपडे असो आहार असो अशा प्रत्येक गोष्टींमध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. त्यात हिवाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे प्रत्येकाने योग्य तो आहार घेणे गरजेचे आहे.

मध – मध खायला गोड आणि चविष्ट असते. तर हेच मध तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये मधाचा तुमच्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. मधामध्ये उष्णता वाढवण्याचे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर मध उपयुक्त ठरते. मध आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास देखील मदत करते. त्यामुळे मधाचा आपला आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

गूळ – गुळ खायला बहुतेक लोकांना आवडते. तसेच गूळ हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहारात गुळाचा समावेश करतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा गुळाचा समावेश आपल्या आहारात करणं खूप फायदेशीर ठरतं. गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता टिकून राहते. तसेच आपल्या शरीराला लोह देखील मिळते. त्यामुळे गूळ खाणे खूप फायदेशीर ठरते. तसेच गुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास देखील मदत होते.

तूप – तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे हिवाळ्यात तुपाचा समावेश आहारात करणं खूप गरजेचं असतं. तूप खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच आपले सर्दी, खोकल्यापासून देखील संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये तुपाचा समावेश तुमच्या आहारात आवर्जून करा.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा