AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : फिरायला गेल्यावर या गोष्टींची काळजी घ्या, टायफॉइड डेंग्यू आसपासही नाही फिरकणार!

पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर भिजल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.

Health : फिरायला गेल्यावर या गोष्टींची काळजी घ्या, टायफॉइड डेंग्यू आसपासही नाही फिरकणार!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 14, 2023 | 10:01 PM
Share

मुंबई : पावसाळा सुरू झाला की प्रत्येकजण फिरायला ट्रेकचे प्लॅन करतात. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत पावसाळ्यात प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण पावसात फिरायला गेल्यानंतर भिजण्यासोबतआरोग्याची काळजी घेणेही तितकंच गरजेचं असतं. कारण पावसात भिजल्यानंतर सर्दी, ताप, खोकला, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड असे अनेक आजार होतात. पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर भिजल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.

फास्ट फूड खाणे टाळा

पावसात बाहेर फिरायला गेल्यानंतर आपण फास्टफूडवर ताव मारतोच. मग गरमागरम भजी असो किंवा वडापाव असो असे पदार्थ आपण आवर्जून खातोच. पावसाळ्यात हे पदार्थ खायलाही छान वाटतं पण पण ते तितकेच आपल्या आरोग्यास हानिकारकही असतात. रस्त्यावर खाल्लेल्या या पदार्थांमुळे आपल्याला जीवाणूजन्य आजार होऊ शकतात, त्यामुळे असे पदार्थ खाणे जास्तीत जास्त टाळावे.

स्वच्छ पाणी

पावसाळ्यात आपण बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर तिथे स्वच्छ पाणी मिळणे जरा कठीणच असते. त्यामुळे जेव्हाही पावसाळ्यात तुम्ही फिरायला जाल त्यावेळी घरून स्वच्छ पाणी असलेली बाटली भरून स्वतःजवळ ठेवावी. तसेच पावसाळ्यात जास्तीत जास्त उकळलेले पाणी प्यावे जेणेकरून आपल्याला सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.

पुरेशी झोप

प्रत्येकाने दररोज पुरेशी झोप घेणं गरजेचं असतं. जर पुरेशी झोप घेतली नाही तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे दररोज सात ते आठ तासांची झोप घेणं आवश्यक असतं. कारण अपूर्ण झोप घेतली तर आपल्याला पचनाच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात, त्यामुळे पावसाळ्यात पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं असतं.

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.