AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : फिरायला गेल्यावर या गोष्टींची काळजी घ्या, टायफॉइड डेंग्यू आसपासही नाही फिरकणार!

पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर भिजल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.

Health : फिरायला गेल्यावर या गोष्टींची काळजी घ्या, टायफॉइड डेंग्यू आसपासही नाही फिरकणार!
| Updated on: Jul 14, 2023 | 10:01 PM
Share

मुंबई : पावसाळा सुरू झाला की प्रत्येकजण फिरायला ट्रेकचे प्लॅन करतात. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत पावसाळ्यात प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण पावसात फिरायला गेल्यानंतर भिजण्यासोबतआरोग्याची काळजी घेणेही तितकंच गरजेचं असतं. कारण पावसात भिजल्यानंतर सर्दी, ताप, खोकला, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड असे अनेक आजार होतात. पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर भिजल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.

फास्ट फूड खाणे टाळा

पावसात बाहेर फिरायला गेल्यानंतर आपण फास्टफूडवर ताव मारतोच. मग गरमागरम भजी असो किंवा वडापाव असो असे पदार्थ आपण आवर्जून खातोच. पावसाळ्यात हे पदार्थ खायलाही छान वाटतं पण पण ते तितकेच आपल्या आरोग्यास हानिकारकही असतात. रस्त्यावर खाल्लेल्या या पदार्थांमुळे आपल्याला जीवाणूजन्य आजार होऊ शकतात, त्यामुळे असे पदार्थ खाणे जास्तीत जास्त टाळावे.

स्वच्छ पाणी

पावसाळ्यात आपण बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर तिथे स्वच्छ पाणी मिळणे जरा कठीणच असते. त्यामुळे जेव्हाही पावसाळ्यात तुम्ही फिरायला जाल त्यावेळी घरून स्वच्छ पाणी असलेली बाटली भरून स्वतःजवळ ठेवावी. तसेच पावसाळ्यात जास्तीत जास्त उकळलेले पाणी प्यावे जेणेकरून आपल्याला सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा सामना करावा लागणार नाही.

पुरेशी झोप

प्रत्येकाने दररोज पुरेशी झोप घेणं गरजेचं असतं. जर पुरेशी झोप घेतली नाही तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे दररोज सात ते आठ तासांची झोप घेणं आवश्यक असतं. कारण अपूर्ण झोप घेतली तर आपल्याला पचनाच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात, त्यामुळे पावसाळ्यात पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं असतं.

Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.