AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसातून किती वेळा नाश्ता आणि जेवण करणे गरजेचे? जाणून घ्या तज्ञांचे मत

जर तुमचा नाश्ता तुम्ही केला नसेल किंवा रात्री जड अन्न खाल्ले असेल तर तुम्ही दिवसभरात काय खाणे गरजेचे आहे हे तज्ञांकडून जाणून घ्या. जर तुम्ही योग्य पद्धतीने आहार घेतला नाही तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देत आहात असा त्याचा समज होतो.

दिवसातून किती वेळा नाश्ता आणि जेवण करणे गरजेचे? जाणून घ्या तज्ञांचे मत
| Edited By: | Updated on: Jan 31, 2025 | 3:31 PM
Share

भारत हा असा देश आहे जिथे परदेशी पर्यटकांना ही इथले जेवण आवडते. परंतु भारतीय संस्कृतीत सामान्यतः ब्रंच अधिक लोकप्रिय आहे. येथे लोक सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान नाश्ता करून कामावर जातात. इतकच नाही तर अनेक वेळा लोक नाश्ता सोडून देतात ही एक वाईट सवय आहे. याशिवाय भारतीयांना दिवसभरात अनेक कप चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे आणि हे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.यामुळे भारतीयांनी एका दिवसात किती वेळा जेवण करावे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत आहार तज्ञ मेधवी गौतम यांनी सांगितले की भारतीयांना दिवसभर फक्त जेवण करण्याची सवय असते आणि त्यानंतर फ्कत ते चहा किंवा कॉफी घेतात. परंतु हे करणे योग्य नाही.

नाश्ता पूर्ण असावा आहार तज्ञ मेधवी गौतम सांगतात की सामान्यतः भारतीयांनी दिवसभरात तीन वेळा जेवण आणि दोन वेळा नाश्ता केला पाहिजे. मेधवी पुढे सांगतात की सकाळचा नाश्ता जड आणि पोटभर असावा कारण यानेच आपला दिवस सुरू होतो. सकाळची सुरुवात उत्साही करण्यासाठी नाश्ता पौष्टिक असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण चूकवण्याची गरज अजिबात नाही. तसेच तुम्ही चहा सोबत काही आरोग्यदायी पदार्थ खाऊ शकता.

मेधवी आणि जेवणाची योग्य वेळ कोणती? मेधवी यांच्यामध्ये तुम्ही सकाळी आठ ते नऊ या वेळेत नाश्ता केला पाहिजे. तर दुपारचे जेवण एक ते दोन या वेळेत करणे अपेक्षित आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत चहा किंवा कॉफी घेऊ शकता पण हे लक्षात ठेवा की तुम्ही नाश्त्यांमध्ये फक्त आरोग्यदायी पदार्थ खाल्ले पाहिजे. याशिवाय संध्याकाळी छोटी भूक भागवण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफी सोबत मुरमुऱ्याचा चिवडा किंवा भेळ तसेच काही आरोग्यदायी स्नॅक्स खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संध्याकाळी स्मुदीचे सेवन करू शकता. यानंतर रात्रीच्या जेवणात हलके अन्न घ्या.

आहार तज्ञ मेधवी गौतम यांनी सांगितले की तुम्ही नेहमी रात्रीचे जेवण हलके करा. खरे तर बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर कोणतीही शारीरिक क्रिया करत नाहीत त्यामुळे अन्न पचनास वेळ लागतो म्हणून तुम्हाला अपचन किंवा ऍसिडिटी ची समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण रात्री आठ वाजेपर्यंत करा आणि तेही हलके करा. जेणेकरून तुमच्या पोटालाही आराम मिळेल.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.