AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसातून किती वेळा नाश्ता आणि जेवण करणे गरजेचे? जाणून घ्या तज्ञांचे मत

जर तुमचा नाश्ता तुम्ही केला नसेल किंवा रात्री जड अन्न खाल्ले असेल तर तुम्ही दिवसभरात काय खाणे गरजेचे आहे हे तज्ञांकडून जाणून घ्या. जर तुम्ही योग्य पद्धतीने आहार घेतला नाही तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देत आहात असा त्याचा समज होतो.

दिवसातून किती वेळा नाश्ता आणि जेवण करणे गरजेचे? जाणून घ्या तज्ञांचे मत
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 31, 2025 | 3:31 PM
Share

भारत हा असा देश आहे जिथे परदेशी पर्यटकांना ही इथले जेवण आवडते. परंतु भारतीय संस्कृतीत सामान्यतः ब्रंच अधिक लोकप्रिय आहे. येथे लोक सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान नाश्ता करून कामावर जातात. इतकच नाही तर अनेक वेळा लोक नाश्ता सोडून देतात ही एक वाईट सवय आहे. याशिवाय भारतीयांना दिवसभरात अनेक कप चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे आणि हे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.यामुळे भारतीयांनी एका दिवसात किती वेळा जेवण करावे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत आहार तज्ञ मेधवी गौतम यांनी सांगितले की भारतीयांना दिवसभर फक्त जेवण करण्याची सवय असते आणि त्यानंतर फ्कत ते चहा किंवा कॉफी घेतात. परंतु हे करणे योग्य नाही.

नाश्ता पूर्ण असावा आहार तज्ञ मेधवी गौतम सांगतात की सामान्यतः भारतीयांनी दिवसभरात तीन वेळा जेवण आणि दोन वेळा नाश्ता केला पाहिजे. मेधवी पुढे सांगतात की सकाळचा नाश्ता जड आणि पोटभर असावा कारण यानेच आपला दिवस सुरू होतो. सकाळची सुरुवात उत्साही करण्यासाठी नाश्ता पौष्टिक असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण चूकवण्याची गरज अजिबात नाही. तसेच तुम्ही चहा सोबत काही आरोग्यदायी पदार्थ खाऊ शकता.

मेधवी आणि जेवणाची योग्य वेळ कोणती? मेधवी यांच्यामध्ये तुम्ही सकाळी आठ ते नऊ या वेळेत नाश्ता केला पाहिजे. तर दुपारचे जेवण एक ते दोन या वेळेत करणे अपेक्षित आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत चहा किंवा कॉफी घेऊ शकता पण हे लक्षात ठेवा की तुम्ही नाश्त्यांमध्ये फक्त आरोग्यदायी पदार्थ खाल्ले पाहिजे. याशिवाय संध्याकाळी छोटी भूक भागवण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफी सोबत मुरमुऱ्याचा चिवडा किंवा भेळ तसेच काही आरोग्यदायी स्नॅक्स खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संध्याकाळी स्मुदीचे सेवन करू शकता. यानंतर रात्रीच्या जेवणात हलके अन्न घ्या.

आहार तज्ञ मेधवी गौतम यांनी सांगितले की तुम्ही नेहमी रात्रीचे जेवण हलके करा. खरे तर बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर कोणतीही शारीरिक क्रिया करत नाहीत त्यामुळे अन्न पचनास वेळ लागतो म्हणून तुम्हाला अपचन किंवा ऍसिडिटी ची समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण रात्री आठ वाजेपर्यंत करा आणि तेही हलके करा. जेणेकरून तुमच्या पोटालाही आराम मिळेल.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.