AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंडाचे आरोग्य सांभाळा नाही तर हृदय येईल धोक्यात ? असा करा बचाव

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिरड्यांच्या संसर्गाशी संबंधित बॅक्टेरिआ हे तोंडाच्या माध्यमाद्वारे रक्तात प्रवेश करून रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

तोंडाचे आरोग्य सांभाळा नाही तर हृदय येईल धोक्यात ? असा करा बचाव
| Updated on: Dec 02, 2022 | 3:15 PM
Share

नवी दिल्ली – आपल्यापैकी बहुतांश लोक हे तोंडाच्या आरोग्याकडे (oral health) विशेष लक्ष देत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)नुसार, जगातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या ही तोंडाच्या (खराब दात, हिरड्या आणि तोंडाचा कॅन्सर) (mouth cancer)आजाराने ग्रस्त आहे. आणि दरवर्षी ही प्रकरणे वाढतच चालली आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मौखिक आरोग्य खराब असेल तर अनेक आजारांचा धोका वाढतो. तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर त्यासाठी दातांचे आरोग्यही (tooth care) निरोगी ठेवणे गरजेचे आहे. दात निरोगी असतील तर अन्न चावून खाण्याची क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते. तसेच दात हे आपला चेहरा आणि आसपासच्या टिश्यूजचा आकार देखील योग्य राखतात.

तज्ज्ञ असे सांगतात की, तोंडाचे आरोग्य खराब असेल तर आरोग्यावर अनेक प्रकारचे हानिकारक परिणाम होऊ शकतात. ज्या लोकांच्या हिरड्यांमध्ये वेदना अथवा दाह होतो, तसेच ज्यांना पेरिओडॉन्टल रोग आहे त्यांनाही हृदयरोगाचा धोका असतो. हिरड्यांच्या संसर्गाशी संबंधित बॅक्टेरिआ हे तोंडाच्या माध्यमाद्वारे रक्तात प्रवेश करून रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

नॉलेज हेड, इल्यूजन अलायनर्स आणि डेंटल एक्सपर्ट डॉ. अनिल अरोरा सांगतात की, तोंडाच्या अथवा मौखिक आरोग्याचा केवळ आपल्या तोंडावरच परिणाम होत नाही तर आजूबाजूच्या अवयवांवर आणि टिश्यूजवरही होतो. उदाहरणार्थ, ज्या रुग्णांच्या दातांमध्ये पोकळी असते त्यांना हिरड्या आणि घशाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

असे राखा तोंडाचे आरोग्य

तोंडाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही सोप्या गोष्टी करण्याची गरज असते, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले. बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती असते, पण त्याचे योग्य प्रकारे पालन केले जात नाही. दररोज ब्रश करणे, फ्लॉस करणे आणि खळखळून चूळ भरणे या क्रिया सर्वांनी दररोज केल्या पाहिजेत. सकाळ व संध्याकाळी, असे दिवसातून दोनदा ब्रश करणे हे चांगल्या मौखिक आरोग्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. तसेच ब्रशचे ब्रिसल्स खराब होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दर सहा महिन्यांनी ब्रश बदलून दुसरा ब्रश वापरला पाहिजे.

रोज फ्लॉसिंगही केले पाहिजे

तोंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी फ्लॉसिंग म्हणजे फ्लॉस करणे हे अत्यंत आवश्यक आहे. हे केल्याने आपल्या दातांच्या फटीमध्ये अडकलेली घाण दूर होते. त्यामुळे दाताला कीड लागत नाही. रात्री झोपणयापूर्वी एकदा फ्लॉसिंग जरू करावे. तसेच काहीही खाल्यानतर खळखळून चूळ भरली पाहिजे. त्यामुळे तोंडाचा पीएच स्तर कायम राहतो. तंबाखू खाणे, धूम्रपान करणे इत्यादी वाईट सवयींमुळे तुमच्या तोंडाचे नुकसान होऊ शकते. दातासंदर्भात कोणतीही समस्या आल्यावर मगच डॉक्टरांकडे जायचे असे करू नये. तर नियमितपणे दातांची तपासणी केली पाहिजे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.