AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photos : एक्सप्रेस वे नंतर मुंबईकडे येणारा आणखी एक महामार्ग ठप्प; रस्ते वाहतुकीचे तीन तेरा

मुंबई-नाशिक महामार्गावर अवजड वाहनाचा अपघात झाल्यामुळे नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

| Updated on: Feb 05, 2026 | 1:47 PM
Share
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीची समस्या ताजी असताना मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीची समस्या ताजी असताना मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

1 / 6
नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर एका अवजड वाहनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर एका अवजड वाहनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नाशिक-मुंबई मार्गिकेवर एका अवजड कंटेनरचा अपघात झाला. या अपघातामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला गेला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नाशिक-मुंबई मार्गिकेवर एका अवजड कंटेनरचा अपघात झाला. या अपघातामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला गेला गेला आहे.

3 / 6
या अपघातामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. एकीकडे कार्यालयीन वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असल्याने या कोंडीत अधिकच भर पडली आहे.

या अपघातामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. एकीकडे कार्यालयीन वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असल्याने या कोंडीत अधिकच भर पडली आहे.

4 / 6
विशेषतः ठाण्यातील साकेत पूल आणि रुस्तमजी गृहसंकुल परिसरात परिस्थिती अधिक बिकट आहे. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अद्याप वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.

विशेषतः ठाण्यातील साकेत पूल आणि रुस्तमजी गृहसंकुल परिसरात परिस्थिती अधिक बिकट आहे. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अद्याप वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.

5 / 6
त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करावा किंवा प्रवासाचे नियोजन थोडे उशिरा करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करावा किंवा प्रवासाचे नियोजन थोडे उशिरा करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

6 / 6
Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.