AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips: वजनावर ठेवायचे असेल नियंत्रण तर ‘या’ गोष्टींकडे कटाक्षाने द्या लक्ष

जर तुम्हालाही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिऊन करावी. त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते तसेच शरीरातील विषारी घटकही बाहेर पडतात.

Weight Loss Tips: वजनावर ठेवायचे असेल नियंत्रण तर 'या' गोष्टींकडे कटाक्षाने द्या लक्ष
| Updated on: Dec 02, 2022 | 10:48 AM
Share

नवी दिल्ली – वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक लोकं डाएटिंग (dieting) करतात, भरपूर वर्कआऊटही करत असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारची डाएट ट्रेंडमध्ये असून, लोक ते फॉलोही करत असतात. तर काही लोक जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम (workout and exercise) करतात, पण आहार आणि लाइफस्टाईल यांच्यात बदल करत नाहीत. त्यामुळे वजन कमी करण्यात त्यांना यश मिळत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आजकाल लोकांचे जंक फूड (junk food) खाण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे वजन आणखी वाढते. जर तुम्हीही वाढते वजन किंवा लठ्ठपणामुळे त्रासला असाल तर काही गोष्टी लक्षात ठेऊन त्यांचे कटाक्षाने पालन करावे.

खाताना टीव्ही पाहू नये

अनेक लोकांना जेवताना टीव्ही पहायची सवय असते. तुम्हालाही अशी सवय असेल तर त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या मतानुसार, टीव्ही पाहताना जेवल्याने आपलं जेवणाकडे लक्ष नसतं. त्यामुळे आपण जास्त खाो. त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. टीव्ही बघताना अनेक जण जंक फूडचे जास्त सेवन करतात. वजन कमी करायचे असेल तर जेवताना टीव्ही पाहणं बंद करावे.

गोड चहा पिऊ नका

काही लोकांना गोड चहा पिण्याची सवय असते. साखरेच्या अतिवापरामुळे शरीरातील साखर आणि चरबी (फॅट्स) वाढते. त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो. वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर गोड चहा पिणं टाळावं. विशेष म्हणजे फुल क्रीमच्या (साय) दुधापासून बनवलेला चहा अजिबात पिऊ नये. यामुळेही तुमचं वजन वाढू शकतं. त्याचबरोबर अन्न पदार्थ तयार करताना त्यामध्य साखरेचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.

नाश्ता न करणे

अनेकदा असे दिसून येते की लोक रात्री उशीरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशिरा उठतात. त्यासाठी लोकांकडे वेळ कमी असतो व ते नाश्ता अथवा न्यारी करणं टाळतात. मग ऑफीसला गेल्यावर भूक लागली तर जंक फूड खाल्लं जातं. या सवयीमुळे वजन वेगाने वाढते. तुम्हालाही अशी चुकीची सवय असेल तर ते ताबडतोब बंद करा. नाश्ता करणे अजिबात टाळू नये. नाश्त्यामध्ये फळे आणि फायबरयुक्त पदार्थ खावेत.

पाणी न पिणे

अनेक लोक दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. जर तुम्हालाही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिऊन करावी. त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते तसेच शरीरातील विषारी घटकही बाहेर पडतात. त्याचबरोबर पुरेसे पाणी प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....