AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुमच्या आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. यासाठी अनेकजण डाएट प्लॅन करून आहाराचे सेवन करत असतात. मात्र अशावेळेस नेमकी शरीराच्या गरजा न ओळखता पदार्थांचे सेवन केले जाते. अशातच अनेकांमध्ये आहाराबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात...

बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुमच्या आहारात 'या' 5 गोष्टींचा करा समावेश
| Edited By: | Updated on: Apr 06, 2026 | 11:57 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहणे हे प्रत्येकाचे प्राधान्य बनले आहे. कारण रोजच्या त्या धावपळीत अनेकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण डाएट करण्याचा निर्णय घेतात जेणेकरून योग्य पोषण आपल्या शरीराला मिळतील. परंतु योग्य आहाराबद्दल अजूनही खूप लोकांमध्ये संभ्रम आहे. लोकं अनेकदा महागड्या सुपरफूड्स किंवा कठीण डाएट प्लॅन्सच्या मागे धावतात. तर तज्ञांचा असा विश्वास आहे की काही सोप्या गोष्टी शरीराला आतून मजबूत बनवू शकतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट यांच्या मते जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश केला तर तुमच्या शरीराच्या ऊर्जेत आणि जीवनशैलीत मोठी सुधारणा दिसून येऊ शकते. चला तर मग कोणते 5 गोष्टी आहारात समावेश करायचा ते जाणून घेऊयात.

आहारतज्ज्ञांच्या मते तुमच्या आहारात या ५ गोष्टींचा समावेश करा

1. क्रूसिफेरस भाज्या

ब्रोकोली, कोबी आणि फ्लावर यांसारख्या भाज्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यांमधील पोषक तत्वे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात. त्यांच्या नियमित सेवनाने शरीर शुद्धीकरण सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

2. बेरी

स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीसारख्या बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावू शकतात. तसेच बेरीजचे सेवन त्वचा आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात.

3. ओमेगा-3 युक्त पदार्थ

ओमेगा-३ फॅटी ॲसिड हे अक्रोड, अळशी आणि तेलकट माशांमध्ये आढळतात. तर या पदार्थांचा समावेश आहारात केल्याने हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यांच्या नियमित सेवनाने दाह कमी होतो आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

4. मसाले

भारतीय खाद्यसंस्कृतीत वापरले जाणारे हळद, आले आणि दालचिनी यांसारखे मसाले नैसर्गिक दाहशामक घटक आहेत. ते शरीराला विविध आजारांपासून वाचवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. रोजच्या आहारात त्यांचा संतुलित वापर फायदेशीर ठरतो.

5. आरोग्यदायी फॅटस

तूप ऑलिव्ह तेल आणि सुकामेवा यांसारखे आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ शरीरासाठी आवश्यक आहेत. ते हार्मोन्सचे संतुलन राखण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात. त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने ऊर्जा मिळते आणि एकूणच आरोग्य सुधारते.

निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या सवयींमध्ये छोटे बदल केल्याने तुम्हाला अधिक काळ तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....