AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : डायबिटीस असलेल्या पेशंटने कांदा खावा की नाही? जाणून घ्या…

डायबिटीस झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. कांद्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट सोबत फायबरची मात्र सुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Health : डायबिटीस असलेल्या पेशंटने कांदा खावा की नाही? जाणून घ्या...
onionImage Credit source: socialmedia
| Updated on: Jun 15, 2023 | 12:05 AM
Share

Health : बहुतेक लोकांना डायबिटीसचा त्रास होताना दिसतो. दररोजचं धावपळीचं जीवन, तणाव, बदलती जीवनशैली, बदलता आहार अशा अनेक गोष्टींमुळे डायबिटीसची समस्या लोकांमध्ये निर्माण होतोना दिसतेय. डायबिटीस झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. पण काही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण अशा एका उपायाबाबत जाणून घेणार आहोत जो डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतो.

जर तुम्ही डायबेटीस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कांद्याचा उपाय जरूर करा. तर आता हा कांद्याचा नक्की उपाय कोणता याबाबत आपण जाणून घेऊया. कांद्यामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, विटामिन सी, फॉलेट, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक असे अनेक घटक असतात. हे घटक शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कांद्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट सोबत फायबरची मात्र सुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

डायबिटीसची लक्षणे कोणती?

डायबिटीस मध्ये भूक लागणे, एखादी जखम लवकर बरी न होणे, थकवा जाणवणे डोळ्यावर अंधारी येणे, इन्फेक्शन होणे, हात पाय दुखणे किंवा सूज येणे अशा प्रकारची अनेक लक्षणे असतात.

डायबिटीस पेशंटला कांदा खाण्याचे फायदे

कांद्यात असलेली फायबरची मात्रा डायबिटीस पेशंटसाठी खूप फायदेशीर असते. कारण कांद्यातील फायबर हे शरीरातील ग्लुकोजची मात्रा नियंत्रणात ठेवते आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

डायबिटीज असलेल्या पेशंटना पचनाच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी डायबेटीस पेशंटनी कांदा खाल्ला पाहिजे जेणेकरून अन्नपचन होण्यास मदत होते.

कांद्यात अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ज्या डायबेटीस पेशंटना सुजेची समस्या आहे त्यांनी कच्चा कांदा खाल्ला पाहिजे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.