AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय? चमचमीत, मसालेदार पाणीपुरी आरोग्यासाठी असते फायदेशीर? अनेक आजारांवर ठरते पाणीपुरी गुणकारी ! जाणून घ्या फायदे

वजन कमी करणारे, डाएट करणारे अनेक लोकं चमचमीत चाट सारखे पदार्थ खाणं टाळतात. ते आरोग्यासाठीही फायदेशीर नसते असे मानतात. पण चविष्ट, नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल अशी पाणीपुरी खूप हेल्दी असते असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का ?

काय? चमचमीत, मसालेदार पाणीपुरी आरोग्यासाठी असते फायदेशीर? अनेक आजारांवर ठरते पाणीपुरी गुणकारी ! जाणून घ्या फायदे
पाणीपुरी खाण्यास नकार दिला म्हणून महिलेला मारलेImage Credit source: Freepik
| Updated on: Mar 15, 2023 | 7:50 AM
Share

नवी दिल्ली : रस्त्यावरचे काही पदार्थ इतके चविष्ट असतात की ते रोज खाल्ले तरी मन तृप्त होत नाही. चाट, वडापाव, पाणीपुरी (panipuri) असे चटपटीत पदार्थ खायला कोणाला आवडत नाही ? असेच एक स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी, ज्याचा भारतातील लोक मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतात. पोट जरी भरले तरी पाणीपुरीसाठी प्रत्येकाच्या पोटात थोडी तरी जागा असतेच. उकडलेले चणे (रगडा), बटाटे (potato) आणि मसालेदार पाण्याने भरलेली पुरी तोंडात जाताच, मन तृप्त होतं. ती केवळ तरुणांनाच नव्हे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानांच खायला (likes eating) आवडते.

पण आरोग्याच्या दृष्टीने ते फारसे फायदेशीर मानले जात नाही. वजन कमी करणारे, डाएट करणारे अनेक लोकं तर त्याकडे बघतही नाहीत. पण हीच पाणीपुरी अतिशय हेल्दी असते असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का ? ती तयार करण्यासाठी अशा घटकांचा वापर केला जातो, ज्याची गणना पोषण-समृद्ध पदार्थांमध्ये केली जाते. पाणी पुरीची पुरी गव्हाचे पीठ किंवा मैदा, रवा यापासून बनते. तसेच त्यामध्ये उकडलेले बटाटे, , उकडलेले हरभरे याचा रगडा तर पाणी हे पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, मीठ, मिरची पावडर, आमचूर, धणे, गूळ आणि चिंच यापासून तयार केले जाते.

पाणीपुरी खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया

1) निरोगी पचन : पाणीपुरी ही गहू, रवा, चणे आणि बटाटे इत्यादीपासून बनवले जातात, जे कार्ब आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. याच कारणामुळे पाणीपुरी खाल्ल्याने तुम्हाला भरपूर फायबर मिळू शकते, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि ती स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते.

2) वजन कमी करणे : हे वाचूनतुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की पाणीपुरी खाऊन वजन कमी कसे होऊ शकते ? पण ते सहजपणे शक्य आहे. पाणीपुरीमध्ये भरलेल्या बहुतेक गोष्टी उकडलेल्या असतात आणि त्यात पाणीही असते. यामुळेच त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3) ॲसिडिटीवर उपचार : ॲसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी डॉक्टर सामान्यतः जलजिरासारखे थंड पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणीपुरी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जलजिरा, कारण त्याशिवाय त्याची चव अपूर्ण मानली जाते. आले, जिरे, पुदिना, काळे मीठ, धणे आणि कधीकधी काळी मिरी जलजीराच्या पाण्यात टाकतात. या सर्व गोष्टींमुळे खराब पोट बरं होण्यास मदत होते आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते.

4) तोंडाच्या अल्सरवर उपचार : पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणार्‍या जलजीराच्या पाण्याने तोंडात आलेले अल्सर किंवा फोड बरे होतात.

5) रक्तातील साखर नियंत्रित करते : कमी कार्बयुक्त सामग्रीमुळे, पाणीपुरी ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली सिद्ध होऊ शकते. मात्र त्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय घडामोडींना वेग
Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग
मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने...
मोठी बातमी! मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने वाढली चिंता, नेमकं काय होणार?
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?