AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Common Eye Mistakes: सावधान ! तुमच्या या चुकांमुळे डोळे होत आहेत खराब

डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि तितकाच संवेदनशील अवयव आहे. अनेकदा लोकं शरीराच्या बाकी अवयवांकडे नीट लक्ष देतात, त्यांची काळजी घेतात पण डोळ्यांकडे दुर्लक्ष होते.

Common Eye Mistakes: सावधान ! तुमच्या या चुकांमुळे डोळे होत आहेत खराब
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 02, 2023 | 12:10 PM
Share

नवी दिल्ली – तसं पहायलं गेलं तर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे एक महत्व आहे पण डोळे (eyes) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा (important part of body) आणि तितकाच संवेदनशील अवयव आहे. डोळ्यांमुळेच आपण हे सुंदर जग पाहू शकतो, अनेक नवे अनुभव घेऊ शकतो. पण अनेकदा लोकं डोळ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्याची विशेष अशी वेगळी काळजी (eye care) घेतली जात नाही.

फोन, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर जास्त वेळ बसल्याने आपल्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. यामुळे डोळे दुखणे, डोळे जड होणे, डोकेदुखी, अस्पष्ट दिसू लागणे, डोळे कोरडे होणे असे अनेक त्रास होऊ शकतात. एवढेच नव्हे तर काही वेळेस आपल्याला लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि शांत झोप न लागण्याचीही समस्या उद्भवते.

रोजच्या आयुष्यात काहीवेळा लोकं अशा चुका करतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होतात व डोळे खराब होऊ शकतात. त्या चुका कोणत्या हे जाणून घेऊया..

डोळे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे – बऱ्याच लोकांना डोळे धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याची सवय असते , मात्र हे योग्य नाही. डोळे नेहमी साध्या किंवा गार पाण्याने धुवावेत.

डोळे न मिचकावणे – डोळे जड होणे किंवा डोळ्याना ताण जाणवणे यापासून बचाव करण्यासाठी डोळे मिचकावणे हा सर्वात उत्तम उपाय ठरतो. यामुळे डोळ्यांना केवळ विश्रांतीच मिळत नाही तर यामुळे डोळे कोरडे पडण्यापासूनही बचाव होतो आणि डोळ्यातील घाणही बाहेर पडते. तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच वेळेस लोकं मोबाईल किंवा टीव्ही पाहताना डोळे मिचकावत नाहीत. अशा वेळी डोळ्यांची उघडझाप करणे किंवा मिचकावणे गरजेचे ठरते.

कृत्रिम आयड्रॉप्सचा अत्याधिक वापर – डोळ्यात काही त्रास अथवा वेदना होत असतील तर बरेच वेळा लोकं आयड्रॉप्सचा अधिक वापर करतात. बराच काळ आयड्रॉप्स वापरल्याने डोळे कोरडे होऊ शकतात.

झोपताना आय मास्कचा वार करणे – बहुतांश लोक झोपताना आय मास्कचा वापर करतात. हॉट कंप्रेस आयमास्कमुळे तुम्हाला थोडा फायदा मिळू शकतो, पण झोपताना दरवेळेस आयमास्क वापरणे हे डोळ्यांसाठी फायदेशीर नसते. थोडा वेळा डोळे उघडे राहणेही महत्वाचे ठरते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डोळ्यांना होणाऱ्या कोणत्याही इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी गरमऐवजी थंड पॅकने शेकावे.

डोळे चोळणे – डोळ्यात काही गेले, किंवा खाज यायला लागली तर बऱ्याच वेळेस लोकं डोळे चोळतात. मात्र ते धोकादायक ठरू शकते. डोळ्यांना खाज आली तर ते चोळण्याऐवजी ते गार पाण्याने धुवावेत.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.