AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी या सवयींचा करा अवलंब

आजकाल बहुतेक लोकं त्यांच्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त असतात. इतका की त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही आणि तसेच त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत राहतात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही छोटे बदल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल.

मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी या सवयींचा करा अवलंब
healthy habitsImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 11, 2025 | 6:05 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाचा ताण आणि इतर अनेक गोष्टींमुळे आजकाल लोकं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त ताण घेणे, वाईट खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैली तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. म्हणून, आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही छोटे बदल करावे लागतील. त्यामुळे आजच्या या लेखात आपण चांगले मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता. नियमित व्यायाम करा

शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे तुमच्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत चालणे, योगा करणे, धावणे किंवा खेळ यासारख्या कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्यायामाचा समावेश करा, विशेषतः जे त्यांचा बहुतेक वेळ एकाच ठिकाणी बसून घालवतात, कारण निरोगी राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे खूप महत्वाचे आहे.

तुमच्या आहाराकडे लक्ष द्या

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मसालेदार आणि बाहेरचे पदार्थ खायला आवडतात. बहुतेक मुले जंकफुड किंवा पॅकबंद अन्न जास्त खातात. परंतु लहानपणापासूनच ही सवय सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि बाहेरचे अन्न घरात आणणे टाळले पाहिजे. त्याऐवजी तुमच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करा. संतुलित आहार घ्या. शक्य तितके जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा.

योग्य झोप घ्या

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी योग्य झोप घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. यामुळे ताण कमी होण्यास आणि दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. अशा परिस्थितीत, झोपण्यापूर्वी थोडा वेळ तुमचा फोन बाजूला ठेवा आणि खोलीतील दिवे मंद करा. लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा

तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करणे खूप महत्वाचे आहे. हे आपल्याला जीवनातील समस्यांना संयम आणि धैर्याने तोंड देण्यास मदत करते. परिस्थिती काहीही असो, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर उपाय शोधा. नकारात्मक विचार कमी करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा सारख्या अनेक पद्धती अवलंबू शकता.

तुमचा वेळ मॅनेज करा

जर तुमच्याकडे जास्त काम असेल आणि वेळ कमी असेल तर त्यामुळे ताण येऊ शकतो. अशावेळी योग्य वेळ मॅनेज करणे खूप महत्वाचे आहे. वेळापत्रक तयार करा. रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. यामुळे तुम्हाला व्यायामासाठीही वेळ मिळेल.

ही सवय अंगीकारावी

मानसिक ताण टाळण्यासाठी, वेळोवेळी विश्रांती घ्या आणि स्वतःसाठी वेळ काढा. तुम्ही तुमच्या इच्छा आणि तुमच्या काही गोष्टींना पहिले प्राधान्य देण्यासाठी वेळ मॅनेज करा. जर तुम्हाला ताण येत असेल तर खोल श्वास घ्या, ध्यान करा किंवा ताज्या हवेत थोडा वेळ फिरा. याशिवाय तुम्ही मेडिटेशन, डायरी लिहिणे, पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे किंवा बागकाम, नृत्य आणि चित्रकला यासारखे तुमचे आवडते काम करणे यासारख्या सवयी देखील पाळू शकता. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.