AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Acidity : तुम्हाला सतत जळजळ, ॲसिडिटीचा त्रास होतो का ? आराम मिळवण्यासाठी प्या ही ड्रिंक्स

जास्त तळलेले, भाजलेले आणि मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटात जळजळ आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही पेयांचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Acidity : तुम्हाला सतत जळजळ, ॲसिडिटीचा त्रास होतो का ? आराम मिळवण्यासाठी प्या ही ड्रिंक्स
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 28, 2023 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली – बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी (unhealthy eating habits) यामुळे आजकाल ॲसिडिटी होणे ही सामान्य समस्या झाली आहे. तेलकट आणि मसालेदार अन्न खाणे (eating spicy food) , झोप न लागणे, अवेळी जेवण करणे इत्यादींमुळेही पोटात जळजळ आणि गॅस होतो. जर तुम्हीही ॲसिडिटीच्या समस्येने (acidity problem) त्रस्त असाल तर काही पेयांचे सेवन केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. ही पेय कोणती व ती कसे तयार करावे हे जाणून घेऊया…

1) जिऱ्याचे पाणी

जिऱ्यामध्ये फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. जिऱ्याचे सेवन केल्याने तुम्हाला ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. ते तयार करण्या एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात जिरे टाकून पाणी उकळावे. नंतर ते पाणी गाळून घ्या, कोमट झाल्यावर जिऱ्याचे पाणी तुम्ही पिऊ शकता.

2) लिंबू व मधाचे पेय

लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोटात असलेल्या बॅक्टेरियांशी लढा देतात. एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवा, ते कोमट झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळा. तसेच एक चमचा मधही मिसळा. हे पेय प्यायल्याने ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते.

3) बडीशेपेचे पाणी

बडीशेप आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. बडीशेपेचे पाणी प्यायल्याने पोटातील जळजळ आणि गॅसची समस्या दूर होते. यासाठी पाण्यात बडीशेप मिसळून ते उकळावे. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्ही ते पाणी पिऊ शकता. तुम्हाला हवे असेल तर रात्रभर बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.

4) हिंगाचे पाणी

हिंग अन्नाची चव आणि सुगंध वाढवते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. हिंगाच्या पाण्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी अर्धा चमचा हिंग पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. या पेयाचे सेवन केल्याने तुम्हाला अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

5) आल्याचे पाणी

आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. जे पोटाची जळजळ आणि गॅसपासून मुक्त होण्यास मदत करतात. हे पेय बनवण्यासाठी आल्याचा तुकडा पाण्यात मिसळून उकळा. किंवा तुम्ही आलं किसूनही पाण्यात घालू शकता. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून त्याचे सेवन करावे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद