Eyesight Home Remedies : सतत स्क्रीनच्या वापरामुळे दृष्टी मंदावत्ये ? करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

आजकाल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे लोकांचे डोळे कमकुवत होत आहेत. जर तुमचीही दृष्टी कमी झाली असेल तर तुम्ही या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

Eyesight Home Remedies : सतत स्क्रीनच्या वापरामुळे दृष्टी मंदावत्ये ? करून पहा 'हे' घरगुती उपाय
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 3:48 PM

नवी दिल्ली – आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव हा खूप महत्वाचा असतो, आणि त्याचे प्रत्येकाचे एक कार्य व महत्व असते. डोळे (eyes) हा आपल्या शरीराचा संवेदनशील आणि अतिशय महत्वाचा अवयव आहे. डोळ्यांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य वाटते. डोळ्यांशिवाय आपले जीवन अंधकारमय होऊ शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेणे (eye care) अत्यंत आवश्यक आहे. पण आजकाल आपल्या जीवनशैलीचा परिणाम डोळ्यांवरही पडू लागला आहे. पौष्टिक अन्नाचा अभाव आणि स्क्रीनचा सतत वापर (excessive use of screen) यामुळे आपली दृष्टी कमी होऊ लागली आहे. जर तुम्हालाही काही गोष्टी अंधुक दिसू लागल्या असतील तर तुम्ही या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

आवळा

आजकाल ऑफिसच्या कामामुळे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा सतत वापर करावा लागतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांवर आता घातक परिणाम होत आहेत. जर तुम्हालाही काही गोष्टी अंधुक दिसू लागल्या असतील तर याचा अर्थ तुमची दृष्टी कमी होत आहे. अशा परिस्थितीत हा रोग बरा करण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरेल. व्हिटॅमिन-सीने समृद्ध असलेला आवळा खाणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. मुरंबा, रस किंवा चटणीच्या स्वरूपात तुम्ही तो खाऊ शकता.

हे सुद्धा वाचा

बदाम

अनेक पोषक तत्वांनी युक्त असलेले बदाम हे आपल्या मेंदूसाठी फायदेशीर तर आहेतच पण त्यांच्या सेवनाने दृष्टीही सुधारते. जर तुम्हालाही दृष्टी कमी होण्याचा त्रास होत असेल तर यासाठी बदामाचे सेवन फायदेशीर ठरेल. डोळ्यात पाणी येत असेल किंवा डोळे लाल होत असतील तर रात्री 6 ते 8 बदाम भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास फायदा होईल.

अंजीर व मनुका

अंधुक दिसत असेल तर अंजीर व मनुकांचे सेवन फायदेशीर ठरते. दृष्टी वाढवण्यासाठी 10 ते 12 मनुका आणि 2 अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते रिकाम्या पोटी खा. असे नियमित केल्याने तुम्हाला लवकरच फायदे दिसून येतील.

बदाम, बडीशोप आणि खडीसाखर

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी तुम्ही बदाम, बडीशेप आणि खडीसाखरेचे सेवन देखील करू शकता. यासाठी बदाम, डीशेप आणि खडीसाखर एकत्र बारीक करून घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण दुधात घालून प्यावे. नियमित सेवनाने फरक दिसून येईल.

गुलाबपाणी

त्वचेसाठी फायदेशीर असलेले गुलाबपाणी आपल्या डोळ्यांसाठीही उपयुक्त असते. जर तुम्हाला तुमची दृष्टी वाढवायची असेल तर झोपण्यापूर्वी डोळ्यात गुलाब पाण्याचे तीन थेंब टाका. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल. मात्र, ते वापरण्यापूर्वी, एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.