AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवल्यानंतर का होते गोड खाण्याची इच्छा? जाणून घ्या काय आहे कारण

अनेकदा काही लोकांना जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते. काही लोकांनी ही सवय करून घेतली आहे. पण जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा का निर्माण होते याचे उत्तर एका फिटनेस आणि डायट कोचने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले आहे.

जेवल्यानंतर का होते गोड खाण्याची इच्छा? जाणून घ्या काय आहे कारण
| Edited By: | Updated on: Jan 18, 2025 | 3:04 PM
Share

काही जणांना जेवण केल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते पण हे आरोग्यासाठी चांगले नाही. आता प्रश्न असा आहे की जेवण केल्यानंतर गोड खाण्याची इच्छा का होते? याचे उत्तर डायट कोच तुलसी नितीन यांनी दिले आहे. तुलसी नितीन ने त्यांच्या इंस्टाग्राम वर याचे कारण सांगितले आहे. खरे तर तुलसी नितीनने वजन कमी करण्याच्या प्रवासात 30 किलो वजन कमी केले आणि गोड खाण्याची इच्छाही नियंत्रित केली आहे. तुलसी नितीन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंट वर वजन कमी करण्याच्या आहाराशी संबंधित काही टिप्स शेअर केल्या आहे. अलीकडेच त्यांनी एका पोस्टमध्ये गोड खाण्याचा इच्छेबद्दल देखील सांगितले आहे.

पोस्ट शेअर करताना तुलसी यांनी लिहिले आहे की, मला आठवते की वजन कमी करण्याच्या प्रवासात मला जेवल्यानंतर गोड खाण्याची तीव्र इच्छा होत होती आणि मी अनेकदा गोड खात होते यानंतर मला खूप अपराधी वाटायचे. या मागचे कारण समजल्यावर मी माझ्या आहारात बदल केला त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसले आणि माझे वजन 30 किलो कमी झाले. गोड खाण्याची इच्छा होण्याची सहा कारणे त्यांनी सांगितली आहे.

जेवल्यानंतर का होते गोड खाण्याची इच्छा

रक्तातील साखरेची अस्थिरता जर तुमचे जेवण शुद्ध कर्बोदकांनी समृद्ध असेल तर तुमची रक्तातील साखर वेगाने वाढू शकते आणि जेवल्या नंतर लगेच कमी होऊ शकते. यामुळे शरीराला लवकर ऊर्जा मिळण्यासाठी शरीराला साखरेची गरज असते म्हणून तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते.

भावनिक कारण बरेच लोक आराम मिळवण्यासाठी किंवा स्वतःला खुश करण्यासाठी गोड खातात. या भावनिक संबंधांमुळे गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. जरी तुम्हाला त्याची भूक लागली नसती तरीसुद्धा.

सवय लागणे जर तुम्हाला प्रत्येक जेवणानंतर गोड खाण्याची सवय लागली असेल तर तुमच्या मेंदूलाही त्याची सवय होते. म्हणूनच जेवल्यानंतर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते.

पौष्टिक आहाराचा अभाव जर तुमच्या जेवणामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असेल तर तुमचे शरीर गोड खाऊन त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते.

डिहायड्रेशन अनेक वेळा आपल्याला भूक लागल्याने तहान लागते. ज्यामुळे आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते तर प्रत्यक्षात आपल्याला पाण्याची गरज असते. डीहायड्रेशन मुळे गोड खाण्याची इच्छा देखील उद्भवते.

कमी ऊर्जा पातळी तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा ऊर्जेची कमतरता वाटत असेल तर साखरेपासून झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही गोड खाण्याकडे आकर्षित होऊ शकतात. या कारणास्तव देखील काही लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.