AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात अवकाळी पावसाचा हाहाकार! कळमना मार्केटमध्ये धान्य भिजले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

| Updated on: Feb 23, 2026 | 10:03 AM
Share

नागपुरातील कळमना मार्केटमध्ये अवकाळी पावसामुळे शेकडो पोती धान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानंतरही धान्य उघड्यावर असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. विदर्भ, मराठवाड्यासह धारशिव आणि परळीमध्येही उभ्या पिकांना मोठा फटका बसला असून, पिके जमीनदोस्त झाली आहेत.

नागपुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत कळमना मार्केटमध्ये मोठे नुकसान केले आहे. रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेकडो पोती धान्य भिजले आहे. यामध्ये शेतकरी आणि व्यापारी दोघांच्याही धान्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही कळमना मार्केट प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे उघड्यावर ठेवलेले गहू, तूर, सोयाबीन यांसारखे धान्य पूर्णपणे भिजले असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भात आधीच विविध संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे टेन्शन या अवकाळी पावसाने आणखी वाढवले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या भविष्यातील उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. पाणी साचलेल्या भागांमध्ये अजूनही धान्य ओले असल्याने नुकसानीची व्याप्ती वाढण्याची भीती आहे.

Published on: Feb 23, 2026 10:03 AM