AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता भारताला ‘या’ आजाराचा विळखा, कोरोनापेक्षाही आहे महाभंयकर, वाचा ‘WHO’ चा रिपोर्ट

टीबी कोरोना महामारीपेक्षा अधिक धोकादायक आणि संक्रामक असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा रिपोर्ट समोर आला आहे. टीबी हा अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार असून त्यातून दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

आता भारताला 'या' आजाराचा विळखा, कोरोनापेक्षाही आहे महाभंयकर, वाचा ‘WHO’ चा रिपोर्ट
| Updated on: Nov 04, 2024 | 9:12 PM
Share

जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार भारतासह पाच देशांमध्ये टीबीचे सर्वाधिक रुग्ण असून टीबी हा कोरोना पेक्षाही धोकादायक संसर्गजन्य आजार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. भारतात टीबीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, असाही यात उल्लेख आहे.

टीबी हा अतिशय धोकादायक संसर्गजन्य आजार आहे. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो हे फार कमी लोकांना माहित आहे.

जागतिक क्षयरोग अहवाल काय सांगतो?

भारतात टीबीचे 26 टक्के, इंडोनेशियात 10 टक्के, चीनमध्ये 6.8 टक्के, फिलिपिन्समध्ये 6.8 टक्के आणि पाकिस्तानात 6.3 टक्के रुग्ण आढळले आहेत. जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार जागतिक स्तरावर या आजाराचे प्रमाण 56 टक्के आहे.

भारतात टीबीचे सर्वाधिक रुग्ण

जागतिक स्तरावर टीबी हा आजार 55 टक्के पुरुष, 33 टक्के महिला आणि 12 टक्के मुले आणि तरुणांमध्ये आढळतो. भारताने 2025 पर्यंत देशातून टीबी या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी अजूनही भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत.

2023 मध्ये अंदाजे 8.2 दशलक्ष लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. टीबीशी संबंधित मृत्यूंची संख्या 2022 मधील 1.32 दशलक्षवरून 2023 मध्ये 1.25 दशलक्षपर्यंत कमी झाली आहे, जरी टीबीमुळे आजारी पडणाऱ्यांची एकूण संख्या किंचित वाढून 2023 मध्ये अंदाजे 10.8 दशलक्ष झाली आहे, अशी माहिती डब्ल्यूएचओच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमुद करण्यात आली आहे.

टीबीचा आजार का होतो?

टीबीचा आजार मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. जेव्हा एखादी व्यक्ती या टीबी जीवाणूच्या संपर्कात येते तेव्हा हा जीवाणू श्वासाद्वारे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. ज्यानंतर तो फुफ्फुसात स्थिरावतो, ज्यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ लागतो. हे बॅक्टेरिया संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतात. संक्रमित व्यक्तीच्या खोकला आणि शिंकण्यामुळे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतात.

टीबीचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत खोकला, त्यामुळे जर खोकला तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ कायम राहिला तर त्याची तपासणी करून पूर्ण खबरदारी घेऊन त्यावर योग्य उपचार करून घ्यावेत.

उपचार शक्य आहे का?

चांगली गोष्ट म्हणजे या आजारावर उपचार पूर्णपणे शक्य आहेत. पण एकदा उशीर झाला की रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सतत खोकला येत असेल तर त्याची तपासणी करून योग्य उपचार करावेत.

टीबी आजाराची लक्षणं कोणती?

खोकला, खोकल्यासह रक्त, छातीत दुखणे जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खोकला येणे, ताप, थंडी, रात्री घाम येणे, वजन कमी होणे, खाण्याची इच्छा कमी होणे, थकवा जाणवणे.

Follow Us
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा