AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याचे समर्थन होऊच शकत नाही.. भारताने थेट सुनावले अमेरिकेला, 3 भारतीयांच्या मृत्यू प्रकरणात..

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावात आल्याचे बघायला मिळत आहे. ओमानच्या आखातात भारतीय जहाजांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. ज्यानंतर आता भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे.

याचे समर्थन होऊच शकत नाही.. भारताने थेट सुनावले अमेरिकेला, 3 भारतीयांच्या मृत्यू प्रकरणात..
S. Jaishankar and Marco Rubio
| Updated on: Jun 13, 2026 | 8:09 AM
Share

मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढला. दोन ते तीन दिवसांपूर्वी ओमान खाडीत अमेरिका आक्रमक झाली. दिसेल त्या जहाजावर हल्ले केले जात होते. 20 भारतीय असलेल्या जहाजावरही अमेरिकेच्या लष्कराने हल्ला केला. यासोबतच एका भारतीय जहाजावर मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला. भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर मोठे हल्ले केले जात आहेत. ओमानच्या आखातात भारतीय कर्मचारी असलेल्या तेलवाहू जहाजावर हल्ले झाली. त्यामध्येच तब्बल 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. ज्याने एकच खळबळ उडाली. इराण आणि अमेरिका युद्धात भारताची स्पष्ट भूमिका आहे. युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, ही भारताची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. मात्र, ओमानच्या आखातात भारतीय जहाजांवरही हल्ले केले जात आहे. यादरम्यानच आता भारत याविरोधात आक्रमक झाला.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या घटनांवरून भारताने नाराजी व्यक्त केली. व्यापारी जहाजांवरील अशा प्रकारच्या जीवघेण्या लष्करी कारवाईला कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थन केले जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. भारताने राजनैतिक पातळीवरही कठोर भूमिका घेतली आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात दूरपर्यंत भारताचे काही नाही. मात्र, तरीही अशाप्रकारची हल्ले केली जात आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली आहे. अमेरिकन नौदलाच्या कारवाईत 3 भारतीय खलाशांचा मृत्यू  प्रकरणात या घटनेचा भारताने निषेध केला.

काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध अगोदरच तणावात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून भारत महान देश असल्याचे सांगतात. मात्र, भारताविरोधात कायम कारवाई करताना दिसतात. काही महिन्यापूर्वीच भारतावर मोठा टॅरिफ त्यांनी लावला. त्यामध्येच आता इराणसोबतच्या युद्धात भारतीय जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संबंध ताणत आहेत.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड