AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मुस्लिम देशातील मुली भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी रांगेत, कारण…

भारतातील पुरुषांशी लग्न करण्यासाठी 'या' मुस्लिम देशातील मुलींचा पुढाकार, कारण..., संख्येत होतेय झपाट्याने वाढ... काय आहे इतिहास आणि परंपरा...

या मुस्लिम देशातील मुली भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी रांगेत, कारण...
फाईल फोटो
| Updated on: Jul 16, 2025 | 1:42 PM
Share

असं कायम म्हटलं जातं ती प्रेमात कोणत्याच मर्यादा नसतात. प्रेमात सर्वकाही मान्य असतं. आता ही भावना अधिकच प्रबळ होत चालली आहे कारण भारतीय पुरुषांशी लग्न करण्यास इच्छुक असलेल्या परदेशी वधूंची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यातील विवाहांच्या वाढत्या संख्येत सीमापार प्रेमाची भावना स्पष्ट होत आहे. 2024 मध्ये भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी अर्ज करणाऱ्या बांगलादेशी महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, जी गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक वाढ आहे.

एवढंच नाही तर, अधिकृत नोंदीनुसार 20 डिसेंबरपर्यंत 100 बांगलादेशी महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी कायदेशीर परवानगी मागितली आहे, तर दुसरीकडे फक्त 11 बांगलादेशी पुरुषांनी भारतीय महिलांसोबत लग्न करण्यासाठी परवानगी मागितली आहे. वर्षाची तुलना केली तर, 2023 मध्ये भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी कायदेशीर परवानगी मागणाऱ्या बांगलादेशी महिलांची संख्या फक्त 44 होती.

इतिहास आणि परंपरा

इतिहास आणि परंपरेबद्दल सांगायचं झालं तर, असं नोंदवण्यात आलं आहे की, बांगलादेशी महिला पारंपारिकपणे भारतीय पुरुषांशी लग्न करण्यास जास्त प्राधान्य देतात. रिपोर्टनुसार, पश्चिम बंगाल राज्यात 410 बांगलादेशी महिलांनी भारतीय पुरुषांसोबत लग्न केलं आहे, तर 76 बांगलादेशी पुरुषांनी बांगलादेशात स्थायिक होण्यासाठी भारतीय मुलींशी लग्न केलं आहे.

भारतीय पुरुषांसोबत का करतात लग्न?

तज्ज्ञांनी मतानुसार, भारतीय नागरिकत्व मिळवणं हे सर्वात संभाव्य कारणांपैकी एक असू शकतं. कारण भारतीय नागरिकाशी लग्न केल्यानंतर सात वर्षांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो.

दहशतवादाचा गड बनत आहे बांगलादेश

बांगलादेशातील एका महत्त्वाच्या भू-राजकीय अपडेटमध्ये, बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर देशाला दहशतवाद आणि अराजकतेचे केंद्र बनवल्याचा आरोप केला. पीडित कुटुंबांना मदत करण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी घरी परतण्याची शपथ घेतली.

आम्ही दहशतवाद्यांचे हे सरकार उलथवून टाकू…

हसीना यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ‘युनूस यांनी सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. त्यांनी सर्व तपास समित्या बरखास्त केल्या आणि दहशतवाद्यांना लोकांना मारण्यासाठी सोडलं आहे. ते बांगलादेशचा नाश करत आहेत. आम्ही दहशतवाद्यांचे हे सरकार उलथवून टाकू.’ असं हसीना म्हणाल्या होत्या.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.