AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्यानमार-भारत सीमा भागात भूकंपाचे धक्के; 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास म्यानमार -भारत सीमा (Myanmar-India border) भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. हा भूंकप ढाक्यासह पश्चिम बंगालच्या (West Bengal) काही भागांमध्ये तर भारतात त्रिपुरा आणि आसामध्ये झाला.

म्यानमार-भारत सीमा भागात भूकंपाचे धक्के; 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 7:02 AM
Share

ढाका : आज पहाटे साडेपाचच्या सुमारास म्यानमार -भारत सीमा (Myanmar-India border) भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. हा भूंकप ढाक्यासह पश्चिम बंगालच्या (West Bengal) काही भागांमध्ये तर भारतात त्रिपुरा आणि आसामध्ये झाला. 6.3 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे. कोलकात्यामध्ये देखील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त समोर येत आहे. युरोपीयन-भूकंप केंद्रांकडून (emsc) याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या शक्तीशाली भूंकपामध्ये किती नुकसान झाले आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही.

आधीही देण्यात आला होता इशारा

दरम्यान आज झालेल्या भूकंपाचे धक्के हे बांग्लादेशच्या चितगाव आणि ढाक्यात प्रामुख्याने जाणवले त्याचा फटका हा काही प्रमाणात भारताला देखील बसला. भारतातील त्रिपुरासह आसाम आणि कोलकात्यात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बागलादेशात यापूर्वीही मोठा भूकंप होण्याचा इशारा भूतज्ज्ञांकडून देण्यात आला होता. बागलादेशात भूंकप झाल्यास त्याचा फटका हा पूर्व भारतालाही बसून शकतो असेही तज्ज्ञांनी सांगितले होते. वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात त्यांना आसे आढळून आले आहे की, जगातील सर्वात मोठय़ा नदी त्रिभुज प्रदेशात दोन प्रस्तर ताणाखाली असून, ते केव्हाही एकमेकांना ढकलू शकतात व त्यामुळे भूकंप होईल. हा भूकंप झाला तर किमान बांगलादेश व भारतातील 140 दशलक्ष लोकांना फटका बसेल. मोठय़ा नद्या व समुद्राची वाढती पातळी यामुळे हे बदल घडून येत आहेत. यात सबडक्शन झोन तयार होत असून, पृथ्वीची एक टेक्टॉनिक प्लेट दुसरीला ढकलत असते.

भूकंप झाल्यास काय काळजी घ्याल?

भूकंपाच्या धक्के जाणवल्यास तातडीने घराबाहेर पडून, मोकळ्या मैदानात या. जर अचानक भूकंप झाला आणि घराच्या बाहेर पडता येणे शक्य नसल्यास घरी असलेल्या कॉट किंवा टेबलखाली स्वता:ला कव्हर करा. या काळात घरातील सर्व विजेची साधने आणि गॅसचे कनेक्शन बंद ठेवा. आपतकालीन स्थिरीमध्ये घटनेची माहिती तातडीने संबंधित यंत्रणेला द्या, त्यामुळे बचाव कार्य वेगाने करता येऊ शकते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.