Lebanon Electricity Blackouts: इंधन संपलं, अख्खा देश ब्लॅकआऊट, लेबनानमध्ये वीज प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी पैसाच नाही!
देशातील दोन मोठे वीजनिर्मिती केंद्र इंधन कमतरतेमुळे बंद झाले आहेत. शनिवारी संपूर्ण ब्लॅकआऊट होण्यापूर्वीच लोकांना दिवसाला फक्त काही तास वीज मिळत होती.
लेबनानमध्ये रविवारी वीज पुरवठा सुरळीत झाला. शनिवारी दुपारपासून अख्खा देश अंधारात बुडाला होता. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत लष्कराने सरकारला त्याच्या साठ्यातून इंधन दिलं, त्यानंतर पॉवर ग्रीड सुरू करण्यात आलं. सध्या ही समस्या केवळ तात्पुरती सोडवली गेली आहे. (Electricity Restored in Lebanon) आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशाच्या सरकारला लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय शोधावा लागणार आहे. देशातील दोन मोठे वीजनिर्मिती केंद्र इंधन कमतरतेमुळे बंद झाले आहेत. शनिवारी संपूर्ण ब्लॅकआऊट होण्यापूर्वीच लोकांना दिवसाला फक्त काही तास वीज मिळत होती. (Electricity is restored in lebanon power grid back online on sunday after army supplies fuel)
देशाचे ऊर्जा मंत्री वालिद फय्याद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, लष्कराने त्याच्या साठ्यातून वीज प्रकल्पांना इंधन पुरवले आहे. त्यानंतर हरन अम्मर आणि जहरानी पॉवर स्टेशनमध्ये काम सुरू झाले आहे. त्यामुळे देशाला आता दिवसांतून काही तास वीज पुरवठा होऊ शकतो. लष्कराने पुरवलेलं इंधन फक्त काही दिवस चालणार आहे. त्यामुळेच लवकरात लवकर सरकारला काहीतरी उपाययोजना करावी लागणार आहे. नाहीतर अख्खा देश पुन्हा अंधारात जाणार आहे. (Lebanon Electricity Cut Off)
सेंट्रल बँकेकडून आर्थिक मदत
ऊर्जा मंत्री फय्याद म्हणाले की, लेबनानच्या मध्यवर्ती बँकेने इंधन आयात करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सची परवानगी दिली आहे, ज्यामुळे महिन्याच्या अखेरीपर्यंत वीज उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यांनी संरक्षण मंत्री, लष्करी कमांडर आणि सरकारी वीज कंपनीचे तातडीने वीज सुरु केल्याबद्दल आभार मानले. 60 लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील बहुतांश लोक आधीपासूनच जनरेटरवर अवलंबून आहेत. (What Causes Electricity Blackouts) हा देश 150 वर्षांच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे, त्यामुळे इंधनाची समस्या आधीच कायम आहे. पण एक दिवसापूर्वी झालेला ब्लॅकआउट हे आतापर्यंतचे सर्वात मोठे वीज संकट होतं.
इंधन आयात करताना समस्या
लेबनान सरकारला इंधन आयात करण्यात अडचणी येत आहेत. (Beirut Lebanon Electricity) कारण दोन वर्षांत देशाचे चलन 90 टक्क्यांनी घसरलं आहे. अनेक मालाच्या किंमती तीन ते चार पटींनी वाढल्या आहेत. यामुळेच लोकांना वाहनांमध्ये इंधन घेण्यासाठी अनेक मैल लांब रांगेत उभे राहावे लागते. अनेक वेळा या दरम्यान हिंसाचारही झाला आहे. बहुतेक लोक विजेसाठी खाजगी जनरेटर वापरतात. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे की, देशातील 78 टक्के लोकसंख्या गरीबीमध्ये जगत आहे.
हेही वाचा: