AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mount Everest : ..म्हणून कुटुंबाने गिर्यारोहक अरुण कुमार यांचा मृतदेह माउंट एव्हरेस्टवरच सोडण्याचा घेतला निर्णय

Mount Everest : माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर आहे. तिथे अरुण कुमार तिवारी या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. कुटुंबाने अरुण कुमार यांचा मृतदेह परत आणण्याऐवजी तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला. यामागे दोन कारणं आहेत.

Mount Everest : ..म्हणून कुटुंबाने गिर्यारोहक अरुण कुमार यांचा मृतदेह माउंट एव्हरेस्टवरच सोडण्याचा घेतला निर्णय
Arun kumar TiwariImage Credit source: X/@EverestToday
| Updated on: May 28, 2026 | 4:06 PM
Share

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर सर करणं सोपं नाही. माउंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. अरुण कुमार तिवारी यांनी सुद्धा हेच स्वप्न पाहिलं होतं. अरुण कुमार तिवारी हे मूळचे हैदराबादचे आहेत. माउंट एव्हरेस्ट शिखरावरुन उतरत असताना त्यांना मृत्यूने गाठलं. माउंट एव्हरेस्टवर चढताना आणि उतरताना निसर्गाशी सामना असतो. मागच्या आठवड्यात अरुण कुमार तिवारी यांचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाने त्यांचा मृतदेह माउंट एव्हरेस्टवरच सोडण्याचा निर्णय घेतला. हा त्यांच्या कुटुंबासाठी कठीण निर्णय होता. पण अरुण कुमार तिवारी यांच्या कुटुंबाने असा निर्णय घेण्यामागे काही कारणं आहेत.

कुटुंबाने अरुण कुमार यांचा मृतदेह तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला यामागे पहिलं कारण धार्मिक आहे. दुसरं कारण मृतदेह तिथून परत आणणं आव्हानात्मक आहे. तेलंगणमधून येणारे अरुण कुमार 53 वर्षांचे होते. ते व्यावसायिक आणि अनुभवी गिर्यारोहक होते. हिलरी स्टेप जवळ त्यांचा मृत्यू झाला. उतरताना ते आजारी पडले. चार शेरपा गिर्यारोहक सहाय्य करण्यासाठी त्यांच्यासोबत होते. अरुण कुमार यांचे मेहुणे सुधीर उपाध्याय यांनी सांगितलं की, माउंट एव्हरेस्ट हे भगवान शिवशंकराचं निवासस्थान असल्याची कुटुंबाची धारणा आहे. तिथेच त्यांनी कायस्वरुपी राहणं कुटुंबाला योग्य वाटतं हे मृतदेह परत न आणण्यामागचं पहिलं कारण झालं. दुसरं कारण म्हणजे इतक्या उंचीवरुन मृतदेह परत आणण्यात अनेक नैसर्गिक आव्हानं आहेत. त्यामुळे कुटुंबाने मृतदेह तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला. हे दुसरं कारण झालं.

निर्सग गिर्यारोहकांची परीक्षा पाहतो

अरुण कुमार तिवारी हे सिनियर आयटी प्रोफेशनल होते. मागच्यावर्षी ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचण्यात अपयशी ठरले होते. पण यावर्षी त्यांनी ते सर केलं. 21 मे रोजी शिखरापासून थोडं खाली त्यांना काळाने गाठलं. तिथे नेमका कशामुळे त्यांचा मृत्यू झाला ते स्पष्ट नाहीय. पण माउंट एव्हरेस्टवर चढाई आणि तिथून सुरक्षित परत येणं आव्हानात्मक असतं. निर्सग गिर्यारोहकांची परीक्षा पाहतो. तिथल्या वातावरणात सतत चढ-उतार होत असतात. त्याच्याशी जुळवून घेणं सोपं नसतं. अनेकांना पहिल्या प्रयत्नाना एव्हरेस्ट सर करणं जमत नाही. अरुण कुमार तिवारी सुद्धा त्यापैकीच एक होते. पण एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी प्रचंड अनुभव गाठिशी असणं आवश्यक असतं.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा