AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू

नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रसुवाला जाणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये पाच जण होते असे सांगण्यात येत आहे. यामध्ये चार चिनी नागरिक होते.

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू
| Updated on: Aug 07, 2024 | 4:08 PM
Share

नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रसुवाला येथे जात असताना या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये चार चिनी नागरिकांचाही सहभाग होता. अलीकडेच 24 जुलै रोजी नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हेलिकॉप्टर कोसळल्याने पुन्हा अपघात झालाय. खराब व्यवस्थापनामुळे नेपाळमध्ये विमान अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील नुवाकोटमधील शिवपुरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. एअर डायनेस्टीचे हे हेलिकॉप्टर होते. पण विमानातील सर्व ५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सूत्राने हिमालयन टाईम्सला सांगितले की, हेलिकॉप्टर काठमांडूहून निघाले होते. पण रस्त्यातच ते क्रॅश झाले.

शिवपुरी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी दुपारी हे हेलिकॉप्टर कोसळलाची माहिती पुढे आली आहे. नेपाळ पोलिसांच्या प्रवक्ते डीआयजी दान बहादूर कार्की यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.

हेलिकॉप्टर काठमांडूहून स्याप्रुबेसीला जात होते.

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते सुभाष झा म्हणाले की, एअर डायनेस्टीच्या 9N-AZD हेलिकॉप्टरने काठमांडू येथून दुपारी 1:54 वाजता स्याप्रुबेसी, रसुवा येथे उड्डाण केले. कॅप्टन अरुण मल्ला हे हेलिकॉप्टर उडवत होते.

विमान दुर्घटनेत १८ लोकांचा मृत्यू

नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही दिवसांपूर्वीच विमान धावपट्टीवरून घसरल्याने अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला होता. शौर्य एअरलाइन्सचे हे 9N-AME (CRJ 200) विमान काठमांडूहून पोखराला जात होते. त्यावेळी त्याला अपघात झाले. विमानात पायलटसह १९ जण होते. त्यापैकी बहुतांश विमान कंपनीचे तांत्रिक कर्मचारी होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान टेक-ऑफसाठी धावपट्टीवर आले, विमानाचा वेग वाढताच ते अचानक एका बाजूला झुकले आणि त्याचा पंख जमिनीवर आदळले, त्यामुळे विमानाला आग लागली.  हायस्पीड विमान आगीच्या ज्वाळांमध्ये अडकले आणि धावपट्टीवरून घसरले आणि उजव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडले.

अपघातानंतर लगेचच विमानतळावर उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. विमानाचा कॅप्टन मनीष शाक्य याला जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. पण यामध्ये 18 जणांना प्राण गमवावे लागले होते.