AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत सर्वात मोठ्या संकटात, होर्मुझनंतर आता हा मार्गही…पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची भीती!

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतापुढे अगोदरच मोठे संकट उभे ठाकलेले आहे. असे असतानाच आता बाब अल मंदेब सामुद्रधुनीमुळे भारताची आणखी मोठी अडचण होऊ शकते. हुथी बंडखोरांमुळे ही अडचण आणखी वाढू शकते.

भारत सर्वात मोठ्या संकटात, होर्मुझनंतर आता हा मार्गही...पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची भीती!
bab al mandebImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 3:25 PM
Share

Bab al Mandeb Strait : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. भारतासह चीन तसेच अन्य देशांना कच्चे तले आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा जाणवत आहे. एवढेच नव्हे तर या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात पट्रोल, डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली असून गॅस सिलिंडरची किंमतही वाढली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता भविष्यात भारताचं टेन्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे. या युद्धात हुथी बंडखोरांनी उडी घेतल्यानंतर आता होर्मुझच्या सामुद्रधुनीनंतर आता आणखी एक महत्त्वाचा सागरी मार्ग बंद होतो की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

आता बाब अल मंदेब मार्ग बंद होणार?

येमेनमधील हुथी बंडखोरांनी इराणच्या युद्धात उडी घेतली आहे. या हुथी बंडखोरांना इराणचे समर्थन असते. त्यामुळेच हुथी बंडखोरांनी येमेनजवळ असलेला हा जलमार्ग बंद केला तर भविष्यात भारतापुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते. फक्त भारतच नव्हे तर युरोपातील देशांनाही मोठा फटका बसू शकतो. यामुळे जगाची अर्थव्यवस्थाच कोलमडू शकते.

बाल अल मंदेब जलमार्ग काय आहे?

बाब अल मंंदेब हा जलमार्ग येमेन देशाजवळ आहे. बाब अल मंदेब हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ अश्रूंचा दरवाजा असा होतो. बाब अल मंदेब ही समुद्रधुनी लाल सागर आणि अदनची खाडी आणि हिंद महासागर यांना जोडते. सामुद्रधुनीचा हा भाग साधारण 100 किमी लांब आणि 30 किमी रुंद आहे. ही सामुद्रधुनी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. युरोपात जाणारी आणि येणारी जहाजे हे याच मार्गाने जातात. जगातील एकूण व्यापारापैकीसाधारण 10 ते 12 टक्के तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने जातो.

भारतावर काय संकट येणार?

दरम्यान, भारतासाठीदेखील हा समुद्र मार्ग खूपच महत्त्वाचा आहे. कारण भारत आपल्या उर्जेच्या गरजेपैकी बराच कच्चा माल याच मार्गाने आयात करतो. या मार्गावर एखादा अडथळा निर्माण झाला तर भारतात तेल आणिन नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होईल. परिणामी भविष्यात पट्रोल, डिझेलची किंमत आणखी वाढू शकते. भारताच्या व्यापारावरही नकारात्मक प्रभाव पडेल. कारण हा मार्ग आशिया-युरोपला जोण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

Follow Us
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.