AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू… पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेलेच असताना पाकिस्तानमधून भारताला अत्यंत मोठी आणि खळबळ उडवणारी धमकी देण्यात आली. पाकिस्तानकडून थेट मुंबई आण दिल्लीमध्ये हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तान या युद्धादरम्यान बावचाळला असल्याचे दिसत आहे.

तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू... पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात...
Pakistan threat India
| Updated on: Mar 22, 2026 | 12:48 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. कुठे गॅसची टंचाई तर कुठे कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. महागाईचे थेट संकट आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे, ही वस्तुस्थिती असली तरीही युद्धाचा फटका थेटपणे अनेक देशांना बसत आहे. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने तेलाची निर्यात आणि आयात थांबली आहे. शिवाय युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले जात असल्याने जगा पुढे ऊर्जेचे थेटपणे संकट आहे. युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. ब्रिटनही युद्धात उतरल्याचे संकेत असल्याने एका विनाशकारी युद्धाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. परमाणू ठिकाणांच्या आसपास हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता पाकिस्तानमधून भारताबद्दल खळबळ उडवणारे विधान करण्यात आले.

पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताला थेट मोठी धमकी दिली आहे. बासित यांनी म्हटले की, विदेशात जी स्थिती आहे, त्यावरून भारत पाकिस्तानला निशाणा बनू शकतो. पाकिस्तानमधील एका न्यूज चॅनलमधील चर्चेत बोलताना अब्दुल बासित यांनी म्हटले की, अमेरिकेने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर काहीही मागचा पुढचा विचार न करता पाकिस्तान थेट मुंबई आणि दिल्लीवर हल्ला करेल.

आम्ही पण असे तसे अजिबात सोडणार नाहीत. पुढे बघता येईल काय काय होते आणि काय नाही ते… बासित यांनी हे विधान सर्वात वाईट परिस्थिती आल्यावर केले जाईल, असे म्हटले आहे. मात्र, बासित यांनी केलेल्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. बासित यांनी मुंबई आणि दिल्लीचे थेट नाव घेतल्याने वाद वाढला आहे. या चर्चेदरम्यानच बासित वारंवार सांगत होते की, ही स्थिती येणे शक्यच नाही.

सध्याच्या घडीला असे काही घडणार नाही पण जर घडले तर आम्हीही सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले. जर आमच्याकडे कोणी वाईट नजरेने बघितले तर पाकिस्तानला वाटेल तिथे तो भारतात हल्ला करू शकतो. सध्याच्या परिस्थितीला असे काही घडावे, असे भारतालाही वाटत नसल्याचे बासित यांनी म्हटले. बासित यांनी 2014 ते 2017 च्या काळात दिल्लीमध्ये पाकिस्तानचे सर्वोच्च राजनयिक म्हणून काम पाहिले आहे. अफगाणिस्तानसोबतच्या तणावाबद्दलही त्यांनी मोठे भाष्य केले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत