AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू… पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेलेच असताना पाकिस्तानमधून भारताला अत्यंत मोठी आणि खळबळ उडवणारी धमकी देण्यात आली. पाकिस्तानकडून थेट मुंबई आण दिल्लीमध्ये हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तान या युद्धादरम्यान बावचाळला असल्याचे दिसत आहे.

तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू... पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात...
Pakistan threat India
| Updated on: Mar 22, 2026 | 12:48 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. कुठे गॅसची टंचाई तर कुठे कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. महागाईचे थेट संकट आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे, ही वस्तुस्थिती असली तरीही युद्धाचा फटका थेटपणे अनेक देशांना बसत आहे. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने तेलाची निर्यात आणि आयात थांबली आहे. शिवाय युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले जात असल्याने जगा पुढे ऊर्जेचे थेटपणे संकट आहे. युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. ब्रिटनही युद्धात उतरल्याचे संकेत असल्याने एका विनाशकारी युद्धाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. परमाणू ठिकाणांच्या आसपास हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता पाकिस्तानमधून भारताबद्दल खळबळ उडवणारे विधान करण्यात आले.

पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताला थेट मोठी धमकी दिली आहे. बासित यांनी म्हटले की, विदेशात जी स्थिती आहे, त्यावरून भारत पाकिस्तानला निशाणा बनू शकतो. पाकिस्तानमधील एका न्यूज चॅनलमधील चर्चेत बोलताना अब्दुल बासित यांनी म्हटले की, अमेरिकेने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर काहीही मागचा पुढचा विचार न करता पाकिस्तान थेट मुंबई आणि दिल्लीवर हल्ला करेल.

आम्ही पण असे तसे अजिबात सोडणार नाहीत. पुढे बघता येईल काय काय होते आणि काय नाही ते… बासित यांनी हे विधान सर्वात वाईट परिस्थिती आल्यावर केले जाईल, असे म्हटले आहे. मात्र, बासित यांनी केलेल्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. बासित यांनी मुंबई आणि दिल्लीचे थेट नाव घेतल्याने वाद वाढला आहे. या चर्चेदरम्यानच बासित वारंवार सांगत होते की, ही स्थिती येणे शक्यच नाही.

सध्याच्या घडीला असे काही घडणार नाही पण जर घडले तर आम्हीही सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले. जर आमच्याकडे कोणी वाईट नजरेने बघितले तर पाकिस्तानला वाटेल तिथे तो भारतात हल्ला करू शकतो. सध्याच्या परिस्थितीला असे काही घडावे, असे भारतालाही वाटत नसल्याचे बासित यांनी म्हटले. बासित यांनी 2014 ते 2017 च्या काळात दिल्लीमध्ये पाकिस्तानचे सर्वोच्च राजनयिक म्हणून काम पाहिले आहे. अफगाणिस्तानसोबतच्या तणावाबद्दलही त्यांनी मोठे भाष्य केले.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.