AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू… पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेलेच असताना पाकिस्तानमधून भारताला अत्यंत मोठी आणि खळबळ उडवणारी धमकी देण्यात आली. पाकिस्तानकडून थेट मुंबई आण दिल्लीमध्ये हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तान या युद्धादरम्यान बावचाळला असल्याचे दिसत आहे.

तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू... पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात...
Pakistan threat India
| Updated on: Mar 22, 2026 | 12:48 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. कुठे गॅसची टंचाई तर कुठे कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. महागाईचे थेट संकट आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे, ही वस्तुस्थिती असली तरीही युद्धाचा फटका थेटपणे अनेक देशांना बसत आहे. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने तेलाची निर्यात आणि आयात थांबली आहे. शिवाय युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले जात असल्याने जगा पुढे ऊर्जेचे थेटपणे संकट आहे. युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. ब्रिटनही युद्धात उतरल्याचे संकेत असल्याने एका विनाशकारी युद्धाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. परमाणू ठिकाणांच्या आसपास हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता पाकिस्तानमधून भारताबद्दल खळबळ उडवणारे विधान करण्यात आले.

पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताला थेट मोठी धमकी दिली आहे. बासित यांनी म्हटले की, विदेशात जी स्थिती आहे, त्यावरून भारत पाकिस्तानला निशाणा बनू शकतो. पाकिस्तानमधील एका न्यूज चॅनलमधील चर्चेत बोलताना अब्दुल बासित यांनी म्हटले की, अमेरिकेने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर काहीही मागचा पुढचा विचार न करता पाकिस्तान थेट मुंबई आणि दिल्लीवर हल्ला करेल.

आम्ही पण असे तसे अजिबात सोडणार नाहीत. पुढे बघता येईल काय काय होते आणि काय नाही ते… बासित यांनी हे विधान सर्वात वाईट परिस्थिती आल्यावर केले जाईल, असे म्हटले आहे. मात्र, बासित यांनी केलेल्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. बासित यांनी मुंबई आणि दिल्लीचे थेट नाव घेतल्याने वाद वाढला आहे. या चर्चेदरम्यानच बासित वारंवार सांगत होते की, ही स्थिती येणे शक्यच नाही.

सध्याच्या घडीला असे काही घडणार नाही पण जर घडले तर आम्हीही सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले. जर आमच्याकडे कोणी वाईट नजरेने बघितले तर पाकिस्तानला वाटेल तिथे तो भारतात हल्ला करू शकतो. सध्याच्या परिस्थितीला असे काही घडावे, असे भारतालाही वाटत नसल्याचे बासित यांनी म्हटले. बासित यांनी 2014 ते 2017 च्या काळात दिल्लीमध्ये पाकिस्तानचे सर्वोच्च राजनयिक म्हणून काम पाहिले आहे. अफगाणिस्तानसोबतच्या तणावाबद्दलही त्यांनी मोठे भाष्य केले.

Follow Us
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी.
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील.
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.