AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून…

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष कमी होत नाही. गेल्या 20 दिवसांपासून भयंकर हल्ले केले जात आहेत. हेच नाही तर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली. यादरम्यानच भारताकडून आता मोठा निर्णय घेण्यात आला.

भारत मैदानात, थेट होर्मुज खाडीबद्दल भारताने घेतला अत्यंत मोठा निर्णय, तब्बल 7 जहाजे भारतातून...
Strait of Hormuz india ship
| Updated on: Mar 21, 2026 | 12:15 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या 20 दिवसांपासून युद्ध पेटले आहे. अमेरिकेसह सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसत आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला शिक्षा देण्याकरिता होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अनेक देशांचे जहाजे तिथे अडकली आहेत. मालवाहू जहाजांची मोठी रांग होर्मुजमध्ये आहे. याच खाडीतून भारतामध्ये एलपीजी गॅस आणि कच्चे तेल दाखल होते. भारताचे अनेक जहाज तिथे अडकून पडली आहेत. भारतात एलपीजी गॅसची कमी असून व्यावसायिक सिलेंडरचे वितरण बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. होर्मुज खाडीत इराण भारताच्या मदतीला आला. भारताचे काही जहाज इराणकडून सोडली जात आहेत. मात्र, भारतात सध्याच्या घडीला मोठा गॅस तुटवडा आहे, ही वस्तुस्थिती आहे. यादरम्यानच भारताचे होर्मुजमध्ये अडकलेल्या दोन जहाजांना होर्मुज खाडी पार करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

आपल्या जहाजांना होर्मुज खाडी पार करता यावी, याकरिता भारत मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. भारताने पूर्ण फिल्डिंग लावली आहे. भारतीय नौदल अनेक ठिकाणी आपली तैनाती वाढवत आहे. दहा दिवसांपूर्वी उत्तर अरबी समुद्रातून भारतीय बंदरांपर्यंत जहाजांना संरक्षण देण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला होता.

होर्मज खाडीच्या आसपास भारताने आपले सात जहाज पाठवल्याची माहिती मिळत आहे. होर्मुज खाडीतून भारतीय जहाजांना सुरक्षा देण्याकरिता भारतीय नाैदलाने हा निर्णय घेतला. आता भारतीय नौदल अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातात अतिरिक्त युद्धनौका तैनात करत आहे. मुळात म्हणजे या तैनातीचा मुख्य उद्देश इतकाच आहे की, एलपीजी आणि इंधन वाहून नेणाऱ्या जहाजांना सुरक्षित वाहतूक करता येईल.

होर्मुज खाडीतून आज भारताचे दोन जहाज निघण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅस या जहाजांवर आहे. या जहाजांना भारतीय नाैदल सुरक्षा देईल. भविष्यातील कोणत्याही तैनातीसाठी पर्शियन गल्फच्या जवळ राहणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळेही भारताकडून अशाप्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. होर्मुज खाडीत स्थिती भयंकर आहे. एकही जहाज इराणकडून सोडले जात नाहीये.

Follow Us
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.