AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय, भारतासाठी सर्वाधिक फायदेशीर

बांगलादेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे.

बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय, भारतासाठी सर्वाधिक फायदेशीर
| Updated on: Dec 29, 2020 | 10:00 PM
Share

ढाका : बांगलादेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. बांगलादेशने बाहेरुन येणाऱ्या तांदळावरील आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. आधी बांगलादेशात तांदुळ आयातीवर 62.5 टक्के आयात शुल्क लागायचं. आता या नव्या निर्णयानंतर हे आयात शुल्क 62.5 वरुन 25 टक्के इतकं झालंय (India may benefits most after Bangladesh decision on rice).

बांगलादेशमध्ये यावर्षी पूराने तांदळाची शेती उद्ध्वस्त झालीय. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात तांदळाचा तुटवडा आहे. म्हणूनच बांगलादेश सरकारने देशात तांदळाचा तुटवडा पडू नये म्हणून आयात शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. दुसरीकडे आयात शुल्कात कपात केल्याने याचा सर्वाधिक फायदा भारताला होणार आहे. भारतात तांदळाचं भरपूर उत्पादन झालंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांगलादेशात तांदुळ निर्यात करुन फायदा मिळवू शकतो. विशेष म्हणजे बांगलादेश आणि भारत जी2जी करारांतर्गत तांदळाचा व्यवहार करु इच्छित आहे.

बांगलादेश पारंपरिकरित्या जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तांदुळ उत्पादक देश आहे. मात्र, सध्या देशातील कमी होणारा तांदुळ साठा आणि स्थानिक बाजारात वाढणारे तांदळाचे दर यामुळे बांगलादेश आगामी काळात मोठ्या प्रमाणात तांदुळ आयात करत आहे. त्यामुळेच तांदुळ आयातक झालेल्या बांगलादेशचा सर्वात मोठा फायदा भारताला होणार आहे. बांगलादेशात वारंवार आलेल्या पूरस्थितीने तेथील तांदळाची शेती उद्ध्वस्त केलीय. तांदुळ उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर बांगलादेशचा क्रमांक लागतो.

बांगलादेशात दरवर्षी जवळपास 3.6 कोटी टन तांदुळाचं उत्पादन होतं. बांगलादेशने तांदुळ आयातीवरील शुल्क कमी केल्याने भारताच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता आगामी काळात भारत आणि बांगलादेशात 2.5 लाख टन तांदुळ आयातीचा करार होऊ शकतो. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश आणि भारतमध्ये नॅफेड (नॅशनल अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) अंतर्गत 1.5 लाख टन तांदुळाची खरेदी करण्यावर चर्चा सुरु आहे.

बांगलादेशात पुराने नुकसान झाल्याने तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झालीय. त्यामुळे भारत आणि बांगलादेशात तब्बल 3 वर्षांनी ही द्विपक्षीय डील होतेय.

हेही वाचा :

1971च्या भारत-पाक युद्धातील हा किस्सा माहिती आहे का?

अमेरिकेने भारताकडे मागितला सल्ला, बांग्लादेशसोबत संबंध मजबूत करण्यावर भर

लासलगावच्या कांदा उत्पादकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, रेल्वेच्या ‘पार्सल व्हॅन’द्वारे कांद्याची बांगलादेशला निर्यात

India may benefits most after Bangladesh decision on rice

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.