टॅरिफचे अब्जावधी डॉलर्स भारतात परत येणार, गुड न्यूज, थेट अमेरिकेतून कंपन्यांच्या..
Trump Tariffs : इराण आणि अमेरिका युद्ध सुरू असताना भारतासाठी आनंदाची बातमी आली. भारत आता मालामाल होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारताला मोठा पैसा मिळणार आहे. विशेष म्हणजे हा पैसा अमेरिकेतून येणार आहे.

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जग तणावात आहे. परिस्थिती अधिक बिकट होत आहे. तेलाचे मोठे संकट निर्माण झाले. भारतालाही या युद्धाचा फटका बसत आहे. यादरम्यानच अमेरिकेडून अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या माध्यमातून जमा केलेले अब्जावधी डॉलर्स परत करण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णयच नाही तर याबाबतची संपूर्ण प्रक्रिया देखील सुरू झाली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफला बेकायदेशीर ठरवले आहे. टॅरिफच्या माध्यमातून 166 अब्ज डॉलर्सची कमाई करण्यात आली होती. आता तेच 166 अब्ज डॉलर्स परत करण्याची वेळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आली. भारतावर तब्बल 200 टक्के टॅरिफ काही दिवस डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला होता. त्यावेळी भारताचे खूप जास्त नुकसान झाले. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत भारतावरील टॅरिफ कमी केला होता.
अमेरिकेकडून परत केला जाणारा टॅरिफ भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अमेरिकेकडून जी टॅरिफची रक्कम परत केली जाणार आहे, त्याच भारताचा मोठा हिस्सा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे 12 अब्ज डॉलर्समध्ये भारताच्या मालाचा यामध्ये समावेश आहे. आता यामुळेच भारत हा या परताव्याचा प्रमुख भागेदार ठरला आहे. भारतात मोठी रक्कम परत येणार आहे.
अमेरिकेकडून परतावा मिळणार असला तरीही भारताला थेट पैसे मिळू शकणार नाहीत. अमेरिकेच्या व्यापार नियमाप्रमाणे, परतावा फक्त आयातदारांना म्हणजेच अमेरिकेत माल आयात करताना शुल्क भरलेल्या अमेरिकन कंपन्यांनाच दिला जातो. त्यामुळे तांत्रिक गोष्टींमुळे हे पैसे भारतीय निर्यातदारांना कंवा सरकारला नाही तर अमेरिकन आयातदारांना मिळतीय. त्यानंतर ते पैसे भारतीय निर्यातदारांना मिळतील.
भारतीय निर्यातदार त्यांच्या अमेरिकन खरेदीदाराकडून चर्चा करून आपली रक्कम परत मिळू शकतात. टॅरिफ हटवल्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत स्वस्त आणि अधिक पोहोचतील. ऑनलाईन प्रक्रिया करून हे शुल्क परत मिळवले जाऊ शकते. 90 दिवसांच्या आत पैसे परत मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान आता भरून निघू शकते.
