AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saudi Arabia : सौदी अरेबियाच्या खतरनाक वाळवंटात एक भारतीय रस्ता चुकला, 4 दिवस फिरत होता, अखेर….

Saudi Arabia desert : सौदी अरेबियात नेहमीच उच्च तापमान असतं. सध्या तिथे भीषण गर्मी आहे. सौदीमधील रुब अल खली खतरनाक वाळवंटी प्रदेश आहे. तिथे एक भारतीय अडकून पडला होता. त्याच्या मोबाइलची बॅटरी संपली. गाडीतलं तेल संपलं. रस्ता भरकटलेला हा भारतीय चार दिवस फिरत होता, अखेर....

Saudi Arabia : सौदी अरेबियाच्या खतरनाक वाळवंटात एक भारतीय रस्ता चुकला, 4 दिवस फिरत होता, अखेर....
Saudi Arbia
| Updated on: Aug 24, 2024 | 11:59 AM
Share

सौदी अरेबिया हा देश अत्याधुनिक सोयी-सुविधा, राहणीमानासाठी जसा ओळखला जातो, तसाच वाळंवटासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. सौदी अरेबियात अगदी दूर-दूर पर्यंत नजर जाईल इतका वाळवंटी प्रदेश पसरलेला आहे. सौदी अरेबियाच्या दक्षिणेला वाळवंट आहे. हा भाग एम्प्टी क्वार्टर म्हणजे रब अल-खली म्हणून ओळखला जातो. सौदी अरेबियाच्या याच वाळवंटी प्रदेशात एक भारतीय रस्ता भरटकला होता. हा NRI तेलंगणचा राहणार होता. कडकडीत ऊन आणि वाळवंटात फसलेल्या या भारतीय NRI चा डीहायड्रेशमुळे अखेर मृत्यू झाला. सतत चालत राहिल्यामुळे त्याच्या शरीरातील पाणी कमी होऊन या व्यक्तीचा मृत्यू झाला. सौदी अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशात कडकडीत ऊन असतं.

मरण पावलेल्या व्यक्तीच नाव मोहम्मद शहजाद खान आहे. त्याचं वय 27 वर्ष आहे. मोहम्मद शहजाद तेलंगणच्या करीमनगरचा राहणार होता. मोहम्मद शहजाद सुदानच्या एक नागरिकासोबत सौदी अरेबियाच्या वाळवंटात होता. त्यावेळी अचानक त्याला GPS सिग्नल मिळणं बंद झालं. त्यानंतर लगेच त्याच्या मोबाइल फोनची बॅटरी संपली. त्याच्या गाडीतील तेलही संपलं.

रुब अल खली खतरनाक वाळवंट

त्यानंतर शहजाद आणि सुदानी नागरिक चार दिवस वाळवंटात अडकून राहिलेत. कडक ऊन, गर्मी आणि खाणं-पिणं नसल्याने दोघांचा मृत्यू झाला. शहजाद मागच्या तीन वर्षांपासून सौदी अरेबियाच्या एका TELECOMMUNICATION कंपनीमध्ये नोकरी करत होता. रुब अल खलीच्या वाळवंटात दोघांचा मृत्यू झाला. हा भाग जगातील खतरनाक वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जातो. हे वाळवंट 650 किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे.

भीषण गर्मीचा हज यात्रेकरुंना फटका

सौदी अरेबियात यावर्षी प्रचंड गर्मी पडली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला. भीषण गर्मीमुळे 2700 पेक्षा जास्त यात्रेकरुन आजारी पडले. यावर्षी 18 लाख लोक हज यात्रेला गेले. भीषण गर्मीमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इजिप्तच्या सर्वाधिक 323 हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला. भारताच्या 68 यात्रेकरुंचा हज दरम्यान मृत्यू झाला. जॉर्डनच्या एकूण 60 हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.