AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात पूर, 700 हून अधिक लोकांचा मृत्यू, भारताला धरले जबाबदार

पाकिस्तानातील नद्यांना आलेल्या पुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत देशाच्या विविध भागात 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानात पूर, 700 हून अधिक लोकांचा मृत्यू, भारताला धरले जबाबदार
flood in PakistanImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 20, 2025 | 1:28 PM
Share

पाकिस्तानातून मोठी बातमी. पाकिस्तान सध्या मान्सूनचा पाऊस आणि पुराच्या कहराशी झुंज देत आहे. देशात पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा 700 च्या पुढे गेला आहे. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताला बसला असला तरी पुराचा पंजाबलाही मोठा फटका बसला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील या आपत्तीसाठी भारताला जबाबदार धरले जात आहे. सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर आलेल्या पुरासाठी पाकिस्तानी माध्यमांनी भारतातून सोडण्यात आलेल्या पाण्याला जबाबदार धरले आहे.

रावी नदीला पूर

पाकिस्तानच्या समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील रावी नदीला पूर आला आहे. भारतातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाकिस्तानातील रावी नदी ओसंडून वाहत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताच्या ज्या भागातून रावी नदी पाकिस्तानात प्रवेश करते, त्या भागातून 60 ते 61 हजार क्युसेक पाणी गेले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या भागातील रावी नदीचा पृष्ठभाग उंचावला आहे.

जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नदीकाठचा भाग रिकामा केला आहे. सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील तीन प्रमुख नद्यांचे पाणी मिळते, तर पूर्वेकडील ब्यास, रावी आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी वापरण्याचा अधिकार भारताला आहे.

पाकिस्तानी लष्कर मदत आणि बचाव कार्यात गुंतले

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने पूरग्रस्त भागात मदतकार्य तीव्र केले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 706 झाली असून पावसामुळे आणि पुरामुळे मृतांचा आकडा 706 वर पोहोचला आहे, असे पाकिस्तानने मंगळवारी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) आपल्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे की, गेल्या 24 तासात आणखी 24 जणांचा मृत्यू झाला असून 26 जूनपासून मृतांचा आकडा 706 वर पोहोचला आहे. पूरजन्य घटनांमधील जखमींची संख्या 965 झाली आहे.

खैबर पख्तूनख्वामध्ये 427 जणांचा मृत्यू

एनडीएमएच्या म्हणण्यानुसार, खैबर-पख्तूनख्वामध्ये आतापर्यंत 427 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर पंजाब प्रांतात 164, सिंधमध्ये 29, बलुचिस्तानमध्ये 22, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 56 आणि इस्लामाबाद भागात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

नऊ छावण्यांमधून 6,903 लोकांना वाचवले

लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी मंगळवारी सांगितले की, लष्कराने मदतकार्य तीव्र केले असून खैबर-पख्तुनख्वामधील नऊ छावण्यांमधून 6,903 लोकांना वाचवले आणि त्यांना वैद्यकीय मदत पुरवली.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच