AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्धात भारताला मोठा दणका, हाहाकाराला सुरूवात, थेट 25 लाख लोक…

इराण आणि अमेरिका युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. या युद्धाचा फटका सर्वांनाच बसत आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. यादरम्यानच आता भारताची झोप उडवणारा रिपोर्ट पुढे आला, ज्याने एकच खळबळ उडाली.

इराण युद्धात भारताला मोठा दणका, हाहाकाराला सुरूवात, थेट 25 लाख लोक...
Iran India
| Updated on: Apr 14, 2026 | 3:25 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. आखाती देशांचीही वाट लागली. ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. कतारच्या गॅस प्रकल्पावरही इराणने हल्ला केला. आखाती देशात भारतीय लोक मोठ्या संख्येने नोकऱ्या करतात, या युद्धामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. अनेकांनी आखाती देश सोडले. या युद्धाची झळ भारताला बसली आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. परिणामी सरकारकडून व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद करण्यात आले. सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल चालकांवर आली. भारतात कच्च्या तेलाची काही समस्या नाही. पण एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. सरकारकडून यातून मार्ग काढला जात आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम भारतात स्पष्टपणे जाणवत आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्राने धक्कादायक रिपोर्ट दिला. या रिपोर्टमुळे भारताची झोप उडाली. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार, भारतातील 25 लाख लोक गरीबीमध्ये ढकलले जाऊ शकतात. देशाच्या मानव विकासाच्या प्रगतीमध्ये या युद्धामुळे मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे. भारताला याचा फटका बसताना दिसत आहे.

हॉटेल बंद असल्याने हजारोंच्या घरात लोक बेरोजगार झाली आहेत. जर हे युद्ध अधिक काळ चालले तर याचा भयंकर परिणाम भारतावर होऊ शकतो. इंधनाची कमी, भाडे, कच्चे तेलावर करण्यात येणारी प्रक्रिया यामुळे सरकारच्या बजेटवर दबाव येत आहे. फक्त हेच नाही तर जागतिक बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे ताण येत आहे.

88 लाख लोक गरीबीच्या खाईत ढकलले जाऊ शकतात, असा खळबळजनक दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला. रिपोर्टनुसार, भारतासाठी ही अत्यंत मोठी आणि धोक्याची घंटा आहे. परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. युद्धाची झळ सर्वच देशांना बसताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. रात्री आठनंतर मॉल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. होर्मुज खाडीतून भारतात जहाज त्या तुलनेत कमी दाखल होत आहेत. त्यामध्येच विदेशात असलेल्या लोकांच्या नोकऱ्याही जात आहेत.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती