AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्धात भारताला मोठा दणका, हाहाकाराला सुरूवात, थेट 25 लाख लोक…

इराण आणि अमेरिका युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. या युद्धाचा फटका सर्वांनाच बसत आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. यादरम्यानच आता भारताची झोप उडवणारा रिपोर्ट पुढे आला, ज्याने एकच खळबळ उडाली.

इराण युद्धात भारताला मोठा दणका, हाहाकाराला सुरूवात, थेट 25 लाख लोक...
Iran India
| Updated on: Apr 14, 2026 | 3:25 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. आखाती देशांचीही वाट लागली. ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. कतारच्या गॅस प्रकल्पावरही इराणने हल्ला केला. आखाती देशात भारतीय लोक मोठ्या संख्येने नोकऱ्या करतात, या युद्धामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. अनेकांनी आखाती देश सोडले. या युद्धाची झळ भारताला बसली आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. परिणामी सरकारकडून व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद करण्यात आले. सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल चालकांवर आली. भारतात कच्च्या तेलाची काही समस्या नाही. पण एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. सरकारकडून यातून मार्ग काढला जात आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम भारतात स्पष्टपणे जाणवत आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्राने धक्कादायक रिपोर्ट दिला. या रिपोर्टमुळे भारताची झोप उडाली. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार, भारतातील 25 लाख लोक गरीबीमध्ये ढकलले जाऊ शकतात. देशाच्या मानव विकासाच्या प्रगतीमध्ये या युद्धामुळे मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे. भारताला याचा फटका बसताना दिसत आहे.

हॉटेल बंद असल्याने हजारोंच्या घरात लोक बेरोजगार झाली आहेत. जर हे युद्ध अधिक काळ चालले तर याचा भयंकर परिणाम भारतावर होऊ शकतो. इंधनाची कमी, भाडे, कच्चे तेलावर करण्यात येणारी प्रक्रिया यामुळे सरकारच्या बजेटवर दबाव येत आहे. फक्त हेच नाही तर जागतिक बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे ताण येत आहे.

88 लाख लोक गरीबीच्या खाईत ढकलले जाऊ शकतात, असा खळबळजनक दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला. रिपोर्टनुसार, भारतासाठी ही अत्यंत मोठी आणि धोक्याची घंटा आहे. परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. युद्धाची झळ सर्वच देशांना बसताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. रात्री आठनंतर मॉल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. होर्मुज खाडीतून भारतात जहाज त्या तुलनेत कमी दाखल होत आहेत. त्यामध्येच विदेशात असलेल्या लोकांच्या नोकऱ्याही जात आहेत.

Follow Us
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.
अकोला महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच राडा; शिंदेसेना-भाजप आमनेसामने
अकोला महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच राडा; शिंदेसेना-भाजप आमनेसामने.
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....