AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतारचा एक निर्णय आणि पाकिस्तान-बांगलादेशची लागली वाट, थेट भारतावर…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. या युद्धाचा मोठा परिणाम आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर होताना दिसतोय. कतारने असा एक निर्णय घेतला ज्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशाची झोप उडाली.

कतारचा एक निर्णय आणि पाकिस्तान-बांगलादेशची लागली वाट, थेट भारतावर...
Pakistan and Bangladesh
| Updated on: Mar 06, 2026 | 10:13 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्त्रायल आणि इराणमधील लोकांचे मोठ्या प्रमाणात जीव गेले. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम सर्वच देशांवर होत आहे. इराणने कतारच्या कारखान्यांवर मोठे हल्ले केले. त्यानंतर कतारकडून असा एक निर्णय घेण्यात आला, ज्याने आशियाई पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक देशांची थेट झोप उडाली. त्यामध्येच सर्वात जास्त संकट पाकिस्तान आणि बांगलादेशावर आहे. कारण त्यांच्याकडे काहीच पर्याय नाहीत. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाची झळ थेट पाकिस्तानला अगोदरच बसली आहे. त्यामध्येच हा अत्यंत मोठा धक्का त्यांच्याकरिता नक्कीच म्हणावा लागेल. कारण इराणच्या समर्थनार्थ पाकिस्तामध्ये मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये थेट अमेरिकन दूतावासाला टार्गेट करण्यात आले. ज्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानातील व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर कतारने एलएनजी पुरवठा आणि उत्पादन पूर्णपणे थांबवले आहे. कतारच्या या निर्णयामुळे गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होणार हे स्पष्टच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात यामुळे ऊर्जेची मोठी समस्या निर्माण झाली. कारण हे दोन्ही देश कतारच्या ऊर्जेवर पूर्णपणे अवलंबून आहेत, त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नाहीये.

कतार आणि संयुक्त अरब अमिराती एकत्रितपणे पाकिस्तानच्या 99 टक्के एलएनजी आयात करते तर बांगलादेशला 72 टक्के भारताला 53 टक्के एलएनजी आयात केला जातो. यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशावर अत्यंत मोठे संकट आहे. त्यामध्येच आता एलएनजीचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.

मुळात म्हणजे पाकिस्तानकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. पूर्णपणे ते कतारवर अवलंबून आहेत. भारताकरिता ही मोठी समस्या नक्कीच नाही, कारण भारताकडे इतरही काही पर्याय आहेत. पण पाकिस्तान आणि बांगलादेश पूर्णपणे अडचणीत आल्याचे दिसत आहे. इराणने जरी कतारच्या प्रकल्पांवर हल्ला केला असला तरीही त्याचा सर्वात मोठा आणि जास्त फटका हा थेट बांगलादेश आणि पाकिस्तानला बसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...