Asim Muneer : पाकिस्तानचा जिहादी आर्मी चीफ आसिम मुनीरचे भारताबद्दल विषारी शब्द, आता बोलतो…
Asim Muneer : पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. इतका मार खाऊनही त्याने भारताबद्दल विषारी शब्द प्रयोग केला आहे. हरल्यानंतर स्वत:ला फिल्ड मार्शल पदवी लावून घेणारा आसिम मुनीर हा पहिलाच लष्करप्रमुख असावा. भारताने पाकिस्तानची जलकोंडी केली आहे, त्यावरही तो बोलला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जी सैन्य कारवाई केली, त्याने पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली. 7 ते 10 मे या चार दिवसाच्या लढाईत पाकिस्तानने भारताकडून जबर मार खाल्ला. पाकिस्तानची सैन्य प्रतिष्ठा धुळीस मिळाली. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानला अक्कल आलेली नाही. पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. इस्लामाबाद दक्षिण आशियामध्ये भारताचा वर्चस्व कधीच मान्य करणार नाही, असं आसिन मुनीरने म्हटलं आहे. हरल्यानंतर स्वत:ला फिल्ड मार्शल पदवी लावून घेणारा आसिम मुनीर हा पहिलाच लष्करप्रमुख असावा. भारताने सिंधू जल करार स्थगित करुन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. भारताने केलेल्या या वॉटर स्ट्राइकचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
पाकिस्तानची जलकोंडी सुरु झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून पुन्हा आक्रमक भाषा सुरु झालीय. “पाकिस्तान सिंधू जल कराराच्या मुद्यावर कधीच तडजोड करणार नाही. कारण हा विषय थेट देशातील 24 कोटी नागरिकांच्या अधिकाराचा विषय आहे” असं आसिम मुनीर म्हणाला. पाकिस्तानी सैन्याची मीडिया विंग विंग इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशंस (ISPR) नुसार, आसिम मुनीरने ही टिप्पणी विविध विश्वविद्यालयाचे कुलपती, मुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा करताना केली.
‘पाण्याच्या विषयावर कधीच झुकणार नाही’
सिंधू जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आसिम मुनीरने ही पाकिस्तानसाठी लक्ष्मण रेखा असल्याच म्हटलं. इस्लामाबाद पाण्याच्या विषयावर कधीच झुकणार नाही, असही मुनीर म्हणाला. “पाणी पाकिस्तानची रेड लाइन आहे. आम्ही 24 कोटी पाकिस्तानींच्या या मौलिक अधिकारावर कोणतीही तडजोड करणार नाही” हे आसिम मुनीरचे शब्द आहेत. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर पुढच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1960 साली हा करार झाला होता. सिंधू जल करार सहा नद्या सिंधु, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलुजवर आधारित आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने वारंवार इशारे दिले. पण भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.
